काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी

मुंबई : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि तीन टर्मचे आमदार आणि सध्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण माजी खासदार रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. कैलास गोरंट्याल यांनी तीन वेळा जालना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव केला. या पराभवाचे खापर गोरंट्याल सातत्याने काँग्रेसवर फोडत होते. उमेदवारी देण्यास खूप वेळ घेतला यामुळे प्रचाराला पुरेसा कालावधीच मिळाला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आता त्यांनी काँग्रेस सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर त्या शक्यतेवर गुरुवार ३१ जुलै रोजी शिक्कामोर्तब झाले.

जालना विधानसभा मतदारसंघाने मागील तीन दशकात कधी कैलास गोरंट्याल तर कधी अर्जुन खोतकर यांनाच आमदार केले. खोतकर चारवेळा तर गोरंट्याल तीनवेळा आमदार झाले. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे गोरंट्याल यांची बाजू मजबूत झाली आहे. तसेच जालन्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपची शत प्रतिशतच्या दिशेने जालन्यात ताकदीने वाटचाल सुरू आहे. यामुळे शिवसेनेच्या चिंतेत भर पडली आहे. मित्रपक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप चतुराईने ताकद वाढवण्यावर भर देत आहे. साताऱ्यातील पाटणमध्ये सत्यजीत पाटणकर, भोरमध्ये संग्राम थोपटे, पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत. यामुळे भाजपच्या वाढत्या ताकदीने शिवसेना चिंतेत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Mantralaya : मंत्रालयातील कॅन्टीनचा 'लूक' बदलणार

- ३ कोटींचा निधी मंजूर; खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासोबत स्वच्छतेवर भर देणार मुंबई : राज्याचे प्रशासकीय

Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली

Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त