Ganpati Pandal : अखेर दंडाचा डोंगर उतरला! मंडपासाठी खड्ड्यांचा दंड १५ हजारांवरून थेट २ हजारांवर!

 खड्ड्यांसाठीच्या दंडात मोठी घट


मुंबई : खड्डा खोदल्यास गणपती मंडळावर १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. या निर्णयावर गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुंबईतील सार्वजनिक मंडळांचं म्हणणं प्रशासनापर्यंत मांडण्यात आलं होतं. त्यावर अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. खड्ड्यांसाठीचा दंड १५ हजारावरुन पुन्हा २ हजारावर आणण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे खणल्यास यापुढे १५ हजारांचा नव्हे, फक्त २ हजारांचा दंड आकारला जाईल! राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.


यापूर्वी मंडपासाठी खड्डा खणल्यास महापालिका प्रत्येक खड्ड्यामागे दोन हजार रुपये दंड आकारत होती. मात्र १५ हजार रुपयांचा दंड हा खूपचं असून तो रद्द करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने राज्य सरकार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली होती. तसंच मुंबईतील रस्त्यांवर हजारो खड्डे पडेल आहेत. त्यावर कंत्राटदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर किती दंड आकारला गेला आहे, असा सवाल उपस्थित करत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.



काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे ?


अखेर गणपती मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड २ हजार रुपये इतकाच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. "गणेशोत्सवाकरिता मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खणल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा", असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला