विद्याविहार उड्डाणपुलाचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

डिसेंबरपर्यंत पूर्व बाजूकडील सर्व कामे करणार पूर्ण


मुंबई  : विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा उड्डाणपूल महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तरीही या पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावीत.


तर, पश्चिम बाजूकडील बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्यानंतर पाडली जावीत. त्यानंतर, पुढील ५ महिन्यांत पुलाची उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत. प्रकल्पामुळे बाधित व्यक्तींचे पर्यायी घरे देऊन पुनर्वसन करावे. त्यासाठी कालमर्याद निश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.


‘एन’ विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांवरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी २९ जुलै २०२५ या प्रकल्प कामाचा महानगरपालिका मुख्यालयातील बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.


लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्गही दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांचीही पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गत केली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.


त्यापूर्वी पूर्व बाजूकडील बहुतांशी कामे नियोजित कालमर्यादेत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यात नाल्याच्या बाजूकडील उपरस्त्याच्या रूंदीकरण कामाचाही समावेश आहे. प्रकल्पामुळे बाधित व्यक्तींचे पर्यायी घरे देऊन पुनर्वसन केले जाणार आहे, असे विविध निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या