केंद्रासोबत पत्रव्यवहारासाठी हिंदी भाषेची सक्ती नाही

  43

केंद्र सरकारची लोकसभेत माहिती


नवी दिल्ली : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी-मराठी भाषेचा वाद आहे. शाळेत इयत्ता १ लीपासून त्रिभाषा सूत्रीचा निर्णय घेत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच, या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरत विरोध केल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय माघारी घेतला. दुसरीकडे केंद्र सरकारनेही काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा केंद्राने सक्तीची केली नसून त्रिभाषासूत्री सक्तीची असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्तीची नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची नसून पत्रव्यवहार करणाऱ्या राज्यांना त्यांच्या मातृभाषेत पत्रव्यवहार करता येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्यावतीने लोकसभेत दिली.


केंद्र सरकार आणि राज्यातील पत्रव्यवहारात हिंदीची कुठलीही सक्ती नाही. केंद्र सरकारकडून राज्याच्या भाषेत पत्रव्यवहार अनुवादित करण्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय भाषा अनुभागाची स्थापना करण्यात आल्याने आता केंद्र सरकारसोबत संवाद साधण्यासाठी किंवा पत्रव्यवहार करण्यासाठी हिंदी भाषेची सक्ती नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.


हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना राय यांनी हिंदी भाषेची सक्ती नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्याच्या अधिकृत भाषेत केंद्रासोबतचा किंवा केंद्राकडून केला जाणारा पत्रव्यवहार भाषांतरित करण्यासाठी विशेष प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. त्यासाठीच, भारतीय भाषा अनुभागाची स्थापन करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निधन

मऊ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन झाले. ते मऊ कुशीनगर,

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

Online Gaming Regulation Act जाहीर झाल्यावर ड्रीम ११ ची मोठी घोषणा! आता जिंकल्यावर पैशांऐवजी मिळणार...

नवी दिल्ली: 'ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५' ला राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता

Online Gaming Regulation Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर अखेर बंदी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

नवी दिल्ली : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती

जर पाकिस्तान अजूनही डंपर असेल तर ते त्यांचे अपयश आहे - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : अलीकडेच आसिम मुनीर त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्येच नव्हे तर संपूर्ण