मुंबईकरांची तहान भागविणा-या सातही धरणात मुबलक पाणीसाठा

धरणांतील पाणीसाठा ८८.३८ टक्क्यांवर


मुंबई (वार्ताहर) : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांमधील पाणीसाठा हा ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये प्रतिदिन ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभाग चिंताग्रस्त होता. मात्र पावसाने मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. जलअभियंता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २९ जुलै रोजी सकाळी ६ च्या नोंदीनुसार उर्ध वैतरणामध्ये ३७ मिमी, मोडकसागरमध्ये ३८ मिमी, तानसामध्ये १६ मिमी, मध्य वैतरणामध्ये ४० मिमी, भातसामध्ये २२ मिमी, विहारमध्ये ६ मिमी, तुलशीमध्ये ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. या सातही धरणांमधील वापरायोग्य पाण्याची पातळी अनुक्रमे ८१.८९, १०० टक्के, ९८.४१ टक्के, ९५.९५ टक्के, ८५ टक्के, ७१.०९ टक्के आणि ८०.२७ टक्के इतकी आहे.



मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठी अधिक


सातही धरणांमध्ये आता ८८.३८ टक्के म्हणजे १२ लाख ७९ हजार १७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (२०२४) याच दिवशी धरणांमध्ये ७३.७७ टक्के म्हणजेच १० लाख ६७हजार ७०३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये याच दिवशी ७१.८४ टक्के म्हणजे १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Supriya Sule : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात; सीट बेल्टमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता

BMC News : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, आता नगरसेवकांना विकास निधी वापरण्याचे खाते झाले खुले !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज

BMC News : मुंबईतील घटनांवर पाहण्याची महापालिकेची दृष्टी झाली अंधूक

- आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलची गुणवत्ता खालावली मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर

Megablock : ठाणे ते वाशी पाच तास रेल्वे सेवा बंद राहणार, तर मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : 'नीट' परीक्षेमुळे गेल्या रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला होता. मात्र, या रविवारी (१० मे) रेल्वेच्या