मुंबईकरांची तहान भागविणा-या सातही धरणात मुबलक पाणीसाठा

धरणांतील पाणीसाठा ८८.३८ टक्क्यांवर


मुंबई (वार्ताहर) : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांमधील पाणीसाठा हा ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये प्रतिदिन ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभाग चिंताग्रस्त होता. मात्र पावसाने मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. जलअभियंता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २९ जुलै रोजी सकाळी ६ च्या नोंदीनुसार उर्ध वैतरणामध्ये ३७ मिमी, मोडकसागरमध्ये ३८ मिमी, तानसामध्ये १६ मिमी, मध्य वैतरणामध्ये ४० मिमी, भातसामध्ये २२ मिमी, विहारमध्ये ६ मिमी, तुलशीमध्ये ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. या सातही धरणांमधील वापरायोग्य पाण्याची पातळी अनुक्रमे ८१.८९, १०० टक्के, ९८.४१ टक्के, ९५.९५ टक्के, ८५ टक्के, ७१.०९ टक्के आणि ८०.२७ टक्के इतकी आहे.



मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठी अधिक


सातही धरणांमध्ये आता ८८.३८ टक्के म्हणजे १२ लाख ७९ हजार १७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (२०२४) याच दिवशी धरणांमध्ये ७३.७७ टक्के म्हणजेच १० लाख ६७हजार ७०३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये याच दिवशी ७१.८४ टक्के म्हणजे १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून