नवी मुंबई विमानतळ हद्दीतील मांस विक्रीवर बंदीची टांगती तलवार

परवाना देण्यापूर्वी वन्यजीवांच्या वावराची होणार तपासणी


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांस विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याबाबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली आहे.


दरम्यान, या तक्रारीला उत्तर देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला परवाना मिळाला नसल्याने तेथे अजून हवाई वाहतूक सुरू झालेली नाही. परवाना देण्यापूर्वी विमानतळाच्या आजूबाजूला वन्यजींवाचा वावर आहे का, हे तपासले जाईल असे जीडीसीएने सांगितले.


दोन महिन्यांपूर्वी विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा करून पर्यावरणप्रेमींनी ही तक्रार केली होती. मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी आदी पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी तक्रारीत नमूद केले होते.

Comments
Add Comment

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण

कंगना रणौतला कोर्टाचा दिलासा, वादग्रस्त प्रकरणातून जामीन मंजूर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिला वादग्रस्त ट्वीट प्रकरणी कोर्टानं दिलासा दिला आहे. देशात

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर