दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक त्रासले आहेत.


पिवळसर रंगाचे, फेसाळलेले पाणी घरातील नळाला येत असून, वारंवार पालिकेकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. सोमवारी पुन्हा दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाहेरून टँकर मागवावा लागत आहे. सोसायटीच्या टाक्याही वारंवार साफ करून घ्याव्या लागत आहेत. यामुळे नागरिक कमालीचे त्रासले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.


डोंबिवली पश्चिमेला नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सोमवारी पुन्हा दूषित पाणी घराघरांत आले आहे. पिवळसर किंवा फेसाळलेले पाणी नळाला येत असल्याने त्याचा वापर कसा करावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे सोसायट्यांना जास्तीचे पैसे देऊन बाहेरून टँकर मागवावा लागत आहे. जुलै महिन्यात सलग तिसऱ्यांदा दूषित पाणीपुरवठ्याची घटना घडली आहे. येथील शारदा सोसायटीमधील नागरिकांनी या प्रकरणी पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र