सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

  42

सहा वर्षे धूळ खात पडून


भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मीरा- भाईंदर महानगरपालिकेने वर्ष २०१९ मध्ये ३ लाख ५५ हजार रु.खर्च करून सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन खरेदी केली होती. परंतु, गेली ६ वर्षे ती एकदाही न वापरल्यामुळे भंगारामध्ये टाकण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर झाली आहे.


गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि कमी किंमतींत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे हा मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाचा उद्देश होता. तत्कालीन महिला व बालकल्याण समिती सभापती दीपिका अरोरा यांनी उपायुक्तांकडे लेखी पत्राद्वारे यंत्रणा खरेदी करण्याची मागणी केली होती. मशीन खरेदी करताना महापालिकेने कोणतीही स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवली नाही.


केवळ संस्कृती एंटरप्रायझेस या ठेकेदाराकडून कोटेशन घेण्यात आले होते. एका महिला स्वयंसेवी संस्थेसोबत उपक्रम राबविण्यासाठी तीन वर्षांचा करारही केला होता. परंतु, संबंधित संस्थेने काम सुरू केले नाही. त्यामुळे न वापरलेली मशीन कार्यालयात पडून राहिली, तिची देखभालही केली गेली नाही.


मशीन पूर्णतः गंजून गेली आहे, तिची मोटर आणि सर्व भाग निकामी झाले असून बंद अवस्थेत आहेत. तसेच नॅपकिन तयार करण्यासाठी खरेदी केलेला कच्चा माल विशेषतः


कापूस पूर्णतः खराब होऊन वापरण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे. शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या महितीनुसार हे प्रकरण उजेडात आले आहे. या संस्थेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची महितीसुध्दा समोर आली आहे.


या बाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती घेण्यासाठी उपायुक्त, समाज विकास अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी संबंधित विभागाला खुलासा करण्याबाबत पत्र दिले असून ती माहिती मिळाली की आपणास देण्यात येईल असे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक

कल्याण परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्ती आणि