'ग्रँड मास्टर' दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून गौरव होणार!

बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन


मुंबई: जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून 'ग्रँड मास्टर' किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.


अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून, आतापर्यंत विविध स्पर्धांत २३ सुवर्ण पदकांसह एकूण सुमारे ३५ पदके पटकावली. दिव्याच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप लक्षणीय आहे. दिव्या आणि कोनेरू हम्पी यांच्या चाली या तोडीस तोड होत्या आणि या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँड मास्टर मिळाला असून तेही महाराष्ट्रातून हे विशेष अभिमानास्पद आहे. दिव्या आणि कोनेरू यांचे हे यश देशातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारे असून, भारताच्या क्रीडा लौकिकात मोलाची भर घालणारे आहे. दिव्याच्या सातत्यपूर्ण यशामागे असलेल्या तिच्या प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे तसेच कुटुंबीयांचे योगदानही मोठे आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिच्या या विश्वविजयी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या असून, येणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही दिव्या असा विजय मिळवेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,