Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतील २६.३४ लाख महिला झाल्या नावडत्या, योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार?

मुंबई: राज्यात सर्वात प्रभावी ठरत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत १२ हप्ते जारी करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान, या योजनेसंबंधित मोठा घोटाळा उघडकीस आला, ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या योजनेचा अनेक पुरुषही लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर, सरकार आता संबंधित लोकांकडून पैसे वसूल करण्याची तयारी करत आहे.


जून २०२४ मध्ये, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत एकूण १२ हफ्त्यांचा लाभ अपात्र लोकांना देखील मिळाला असल्यामुळे, राज्याच्या महसुलावर देखील त्याचा ताण पडला आहे.


या पार्श्वभूमीवर, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे की पडताळणी दरम्यान असे आढळून आले की लोक अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत, राज्य सरकारने २६.३४ लाख अपात्र लोकांना योजनेतून काढून टाकले आहे.


अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, तपासणीत असे दिसून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते. काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी होते. काही प्रकरणांमध्ये, पुरुषांनीही या योजनेसाठी अर्ज केले होते. त्या पुढे म्हणाल्या की, महिला आणि बालविकास विभागाने सर्व अर्जांची पात्रता तपासण्यासाठी सर्व सरकारी विभागांकडून माहिती मागवली होती. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने सांगितले की, अपात्र असूनही सुमारे २६.३४ लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.



किती खाती निलंबित करण्यात आली?


इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, २६.३४ लाख अपात्र लोकांची खाती तात्पुरती निलंबित करण्यात आली आहेत. याशिवाय, सुमारे २.२५ कोटी पात्र लाभार्थ्यांना जून २०२५ चा हप्ता मिळाला आहे.


लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, ‘ज्या महिलेचे अकाऊंट नव्हते, त्यावेळी त्यांनी पुरुषांचे अकाऊंट दिले का? हा एक प्रश्न आहे. अर्जांच्या छावणीतून हे समोर येईल. खरंच पुरुषांनी भरले आहेत का? बँकेत महिलेचे खाते नसेल त्यामुळे अर्ज भरलेला असू शकतो, मात्र तपासणी झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही. याआधी अपात्र महिलांनी अर्ज केले होते, मात्र त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.’



निलंबित खात्यांची चौकशी होणार


ज्यांची खाती निलंबित करण्यात आली आहेत त्यांच्या खात्यांची संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी चौकशी करतील. पडताळणीत ते पात्र आढळल्यास निलंबित खात्यांना पुन्हा लाभ मिळू लागतील. चुकीची माहिती देऊन फायदा घेणाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करू शकते असे म्हटले जात आहे.



लाडकी बहीण योजनेत सर्व महिला सहभागी होऊ शकतात का?


ही योजना फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ही योजना अशा महिलांना लागू होत नाही ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.


दरम्यान लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.


Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा