Accident : झारखंडमध्ये कावड यात्रेकरूंनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली, १८ कावडियांचा मृत्यू

झारखंड: झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. कावड यात्रेकरूंनी भरलेल्या एका बसला ट्रकने धडक दिल्याने १८ कावडियांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर झाला, ज्यामुळे परिसरात हाहाकार उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर, मोहनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात एका ट्रकने कावडिया यात्रेकरूंनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत १८ यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. श्रावण महिन्यात देवघर येथे बाबा बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू येतात. हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा कावड यात्रेकरूंची मोठी गर्दी असते.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, कावड यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने