Accident : झारखंडमध्ये कावड यात्रेकरूंनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली, १८ कावडियांचा मृत्यू

झारखंड: झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. कावड यात्रेकरूंनी भरलेल्या एका बसला ट्रकने धडक दिल्याने १८ कावडियांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर झाला, ज्यामुळे परिसरात हाहाकार उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर, मोहनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात एका ट्रकने कावडिया यात्रेकरूंनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत १८ यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. श्रावण महिन्यात देवघर येथे बाबा बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू येतात. हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा कावड यात्रेकरूंची मोठी गर्दी असते.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, कावड यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या