Baramati Accident : धक्कादायक! अपघातात मुलगा आणि दोन नातींचा मृत्यू, दुःख सहन न झाल्याने आजोबांनी सोडले प्राण

बारामती : एकाच कुटुंबातील चार जीव एकाच क्षणात हरपल्याने संपूर्ण बारामती हादरून गेली आहे. रस्ते अपघातात मुलगा आणि दोन नातींचा जागीच मृत्यू झाला आणि ही बातमी ऐकून काही तासांतच वडिलांनीही प्राण सोडले. एकाच कुटुंबातील ४ जणांनी जगाचा निरोप घेतल्याने गावात शोककळा पसरलीये. आज पहाटे आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या मुलाचा आणि दोन नातीचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसून आजोबा राजेंद्र आचार्य यांनी जीव सोडलाय. मुलगा वडील राजेंद्र आचार्य हे आजारी असल्याने त्यांना फळ आणण्यासाठी बाहेर गेला असता हा अपघात झाला.




डंपरने दुचाकीला दिली धडक


काल रविवारी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाला होता. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली आणि यात दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेल्याने तिघेही चिरडले गेले यात वडिल आणि दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.



मुलाच्या आणि नातींच्या निधनाबद्दल कळताच आजोबांनी सोडले प्राण


या घटनेत ओंकार आचार्य, त्यांची चार वर्षाची मुलगी मधुरा आणि दहा वर्षाची मुलगी सई या दोघींचा मृत्यू झाला. घरातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मुलीचे आजोबा यांना समजली आणि याचा धक्का ७० वर्षीय आजोबाला बसला. आज पहाटे मयत मुलींचे आजोबा राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. घरातील चौघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.



फळ आणण्यासाठी गेले अन्...


राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आले. वडिलांना घरी आणल्यानंतर ओंकार आचार्य हे फळ आणण्यासाठी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मार्केटमध्ये गेले असता त्यांना डंपरने धडक दिली. राजेंद्र आचार्य हे अगोदरच आजारी होते आणि त्यामध्येच त्यांना मुलाचा आणि नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला आणि त्यांचे निधन झाले.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे