Baramati Accident : धक्कादायक! अपघातात मुलगा आणि दोन नातींचा मृत्यू, दुःख सहन न झाल्याने आजोबांनी सोडले प्राण

बारामती : एकाच कुटुंबातील चार जीव एकाच क्षणात हरपल्याने संपूर्ण बारामती हादरून गेली आहे. रस्ते अपघातात मुलगा आणि दोन नातींचा जागीच मृत्यू झाला आणि ही बातमी ऐकून काही तासांतच वडिलांनीही प्राण सोडले. एकाच कुटुंबातील ४ जणांनी जगाचा निरोप घेतल्याने गावात शोककळा पसरलीये. आज पहाटे आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या मुलाचा आणि दोन नातीचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसून आजोबा राजेंद्र आचार्य यांनी जीव सोडलाय. मुलगा वडील राजेंद्र आचार्य हे आजारी असल्याने त्यांना फळ आणण्यासाठी बाहेर गेला असता हा अपघात झाला.




डंपरने दुचाकीला दिली धडक


काल रविवारी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाला होता. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली आणि यात दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेल्याने तिघेही चिरडले गेले यात वडिल आणि दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.



मुलाच्या आणि नातींच्या निधनाबद्दल कळताच आजोबांनी सोडले प्राण


या घटनेत ओंकार आचार्य, त्यांची चार वर्षाची मुलगी मधुरा आणि दहा वर्षाची मुलगी सई या दोघींचा मृत्यू झाला. घरातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मुलीचे आजोबा यांना समजली आणि याचा धक्का ७० वर्षीय आजोबाला बसला. आज पहाटे मयत मुलींचे आजोबा राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. घरातील चौघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.



फळ आणण्यासाठी गेले अन्...


राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आले. वडिलांना घरी आणल्यानंतर ओंकार आचार्य हे फळ आणण्यासाठी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मार्केटमध्ये गेले असता त्यांना डंपरने धडक दिली. राजेंद्र आचार्य हे अगोदरच आजारी होते आणि त्यामध्येच त्यांना मुलाचा आणि नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला आणि त्यांचे निधन झाले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये