ऋषभ पंतने सोशल मीडियावर दुखापतीबाबत दिले मोठे अपडेट, पुनरागमनावर काय म्हणाला जाणून घ्या...

मुंबई : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्धचा शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. ऋषभ पंतने आपल्या अधिकृत 'X'अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या दुखापतीची माहिती दिली आहे. त्याने आपल्या प्लॅस्टर केलेल्या पायाचे आणि चालण्यासाठी वापरत असलेल्या काठ्यांचे फोटो शेअर केले आहेत.

यासोबत त्याने एक नोटही लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, "तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी तुमचा आभारी आहे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की, दुखापतीतून बाहेर आल्यानंतर मी त्याच फॉर्ममध्ये परत यावे. लोकांना अपेक्षा आहे की मी मैदानावर परत आल्यावर त्याच पद्धतीने खेळेल आणि मी पण तेच करू इच्छितो. मी पुनरागमनावर लक्ष केंद्रित केले आहे. मी प्रत्येक गोष्ट एका वेळी एक एक पाऊल टाकून पुढे जात आहे. माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट असाल, तर मानसिकदृष्ट्या फिट मजबूत राहणे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट असाल, तर मानसिकदृष्ट्या फिट राहणे सोपे होते. फ्रॅक्चर ठीक झाल्यावर मी परत येईन. माझी रिकव्हरी हळू होत आहे, मी विश्रांती घेत आहे, दिनचर्या पाळत आहे आणि माझे १००% देत आहे. देशासाठी खेळताना मला अभिमान वाटतो आणि मला आवडणाऱ्या खेळात परत येण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे."





कशी झाली होती ऋषभ पंतला दुखापत?


इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना, ख्रिस वोक्सचा एक चेंडू स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला लागला. यानंतर तो ३७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. दुखापत असूनही, जेव्हा संघाला त्याची गरज होती, तेव्हा तो पुन्हा मैदानात परतला. त्याने अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला पहिल्या डावात ३५० च्या पुढे धावसंख्या नेण्यात मदत केली. त्याच्या या खेळीचे क्रिकेट तज्ज्ञांनी खूप कौतुक केले.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत