Operation Sindoor वर आज लोकसभेत १६ तास चर्चा, राजनाथ सिंह करणार सुरूवात

नवी दिल्ली: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बहुचर्चित चर्चा आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही चर्चा गरजेची कागदपत्रे संसदेच्या पटलावर ठेवल्यानंतर सुरू होईल. या १६ तासांच्या चर्चेची सुरूवात खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीही हस्तक्षेप करतील आणि आपली बाजू मांडतील असे सांगितले जात आहे.



आक्रमक भूमिकेसह चर्चेमध्ये उतरणार सरकार


सरकार या चर्चेमध्ये आक्रमक भूमिका मांडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेआधी सीडीएस जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह अनेक बैठका घेतल्या.


या बैठकांमध्ये सरकारची रणनीतीला अंतिम स्वरूप देण्यात आले. तर ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधी पक्षगट इंडिया देखील सक्रिय झाले आहे. चर्चेआधी त्यांचीही एक बैठक होत आहे. यातही रणनीतीवर चर्चा होईल.



ऑपरेशन सिंदूरवर सरकारकडून उत्तर मागतायत विरोधी पक्ष


ऑपरेशन सिंदूरची सुरूवात जम्मू-काश्मीरल पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ऑपरेशनला विजय उत्सव असे म्हटले आहेत. सरकारी रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशन सिंदूर केवळ २२ मिनिटांत पूर्ण झाले आणि यात सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हे १०० टक्के यशस्वी सैन्य अभियान सांगितले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षाने या ऑपरेशनबाबत सरकारला उत्तर मागितले आहे.


Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन