नगरमध्ये संविधान भवनासाठी १५ कोटी - उपमुख्यमंत्री पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


अ.नगर : नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. देशाची अखंडता डॉ. आंबेडकर यांच्यामुळे टिकून आहे. त्यांचा समता, बंधुत्वाचा विचार आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे, त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारत आहे.


नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. देशाची अखंडता डॉ. आंबेडकर यांच्यामुळे टिकून आहे. त्यांचा समता, बंधुत्वाचा विचार आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे, त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.नगर शहरातील मार्केट यार्ड चौक परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.संग्राम जगताप, आ.काशिनाथ दाते, माजी खा. डॉ सुजय विखे पाटील, माजी आ.लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे,माजी उपमहापौर गणेश भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संपत बारस्कर, प्रा.जोगेंद्र कवाडे, भन्ते राहुल बोधी मा.आयुक्त डॉ पंकज जावळे, कृती समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे,अशोक गायकवाड,अजय साळवे,मयूर बांगरे, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम,भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, धनंजय जाधव, मनेष साठे, निखिल वारे, सुनील त्रिंबके, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल देशाचे संविधान बदलले जाईल अशा अफवा पसरवल्या जात आहे, मात्र जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्रसूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलले जाणार नाही,असे ते म्हणाले.सुरेश बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारावा यासाठी समाजाने मोठा लढा उभा केला.आंदोलने,पत्र व्यवहार केले आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्या मुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. या पुतळ्याच्या माध्यमातून इतिहास लिहिला जात आहे. पूर्वीच्या पुतळ्याला ६० वर्षे झाली होती, त्यामुळे नवीन जागेत स्मारक करण्याचा विचार होता. मात्र, समितीला हिच जागा हवी असल्याने संघर्ष करावा लागला. आता संसदेतील पुतळ्याच्या पाश्र्वभूमीवर येथील पुतळ्याची उभारणी केली आहे. अनावरणाची तारीख ठरली होती. परंतु आमच्या घरात दुःखद घटना घडल्याने ती आंबेडकर प्रेमींनी स्वतःहून पुढे ढकली. आमच्या दुःखात सहभाही झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.


संविधान भवनासाठी त्यांनी १५ कोटींची मागणी केली. दादांनी ती दहाच मिनिटांत मंजूर केली.शहरात महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विकास कामाचे सादरीकरण आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी अशोक गायकवाड, अजय साळवे, नाथाभाऊ आल्हाट, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, भन्ते राहुल बोधी यांची मनोगते झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापाड यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी मानले.


आ.जगताप यांच्यामुळे हा पुतळा उभा राहिला आहे. त्यांचे वडील अरुणकाका यांचा समाजसेवेचा वारसा ते पुढे नेत आहेत. मात्र, ते भाषण करताना कधी कधी घसरतात. त्यामुळे त्यांना आम्हाला समजावून सांगावे लागते, अशी मिश्किल टिपण्णी अजितदादांनी आपल्या भाषणात केली. त्यावर एकच हशा पिकला. दरम्यान, अजितदादा हे भाषणासाठी उभे राहिले, यावेळी व्यासपीठावरील कुलरच्या हवेने त्यांचे केस विस्कटले. त्यामुळे दादांनी अगोदर खिशातून कंगवा काढत केस विंचारल्याने चांगलाच हशा पिकला. त्यावर माझेच केस विंचारतोय, तुमचे नाही, असे म्हणताच पुन्हा हशा पिकला.


अहिल्यानगरमध्ये सर्वांच्या सहकार्याने डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी एक व्हिजन समोर ठेवून या कामासाठी सर्वांना एकत्र आणले. पूर्णाकृती पुतळ्यामुळे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकर जोमाने काम करत आहे. त्यात अजित दादा यांच्यासारखे चाणाक्ष आणि शिस्तप्रिय मंत्री आहेत. त्यामुळे सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे यावेळी भन्ते डॉ. राहुल बोधी यांनी सांगितले

Comments
Add Comment

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करणार - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत.... येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व

Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत... मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही

Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल