मातोश्री बंगल्यावर उद्धव - राज भेट, पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा


मुंबई : शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्री बंगल्यावर आले. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मातोश्री बंगल्यावर उद्धव आणि राज एका फोटोफ्रेममध्ये दिसले. या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू युती करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.


सध्या मनसेचे शून्य आमदार आणि शून्य खासदार आहेत. शिउबाठाचे मर्यादीत खासदार आणि आमदार आहेत. पण विरोधी गटात असल्यामुळे अनेक मुद्यांवर टीका टिप्पणी करणे एवढेच शिउबाठाच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव आणि राज यांनी केली तर विरोधी गटाची ताकद वाढेल, असे काही जणांना वाटत आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंना सत्तेची सूत्र स्वतःच्या हाती हवी असल्यामुळे युती होणे कठीण आहे, असे मत अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.



शिउबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद महाराष्ट्रात ठराविक भागांमध्येच आहे. यातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही अशी शहरे आहेत जिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांची राजकीय जागा बळकावू इच्छित आहेत. उद्धव आणि राज या दोघांनाही आदेश देणे आवडते. यातूनच काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्ष झाला होता. एकत्र आल्यास हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली तरी निवडणुकीसाठी अशी युती होणे कठीण वाटते, असे मत अनेक अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.




Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली