TCS कडून १२,२०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय

मुंबई:  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारतातील सर्वात मोठी आय-टी सेवा पुरवणारी कंपनी २०२६आर्थिक वर्षात आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २ टक्के म्हणजेच १२,२०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीने रविवारी सांगितले की ही कपात मुख्यतः मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या पातळीवर केली जाईल.

एआय आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात कंपनीने पुनर्रचना सुरू केली असून, कर्मचाऱ्यांचे पुनर्प्रशिक्षण आणि नव्या भूमिकांमध्ये पुनर्नियोजन सुरू आहे. मात्र, काही भूमिका अशा आहेत ज्या पुनर्नियोजित करणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे ही कठोर निर्णय घेण्यात येत असल्याचे टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन यांनी स्पष्ट केले.

कृतिवासन म्हणाले, “ही कपात एआय मुळे नाही, तर भविष्यात लागणाऱ्या कौशल्यांच्या आधारे केली जात आहे. ही गरज माणसांची संख्या कमी करण्याची नाही, तर योग्य कौशल्यांच्या तैनातीची आहे.”

टीसीएस ने आश्वासन दिले आहे की, ग्राहक सेवा यावर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने छंटनी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेव्हरन्स पॅकेज, नोटीस कालावधीचे वेतन, आरोग्य विमा आणि नवीन नोकरीसाठी सहाय्य यासारखी मदत जाहीर केली आहे.

FY25 च्या एप्रिल–जून तिमाहीत टीसीएस ने ६,०७१ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली असून, नेट वाढ ५,०९०  इतकी झाली आहे. मात्र, आगामी छंटणीमुळे टीसीएस चे धोरण फक्त संख्यात्मक वाढ न करता गुणवत्तापूर्ण आणि भविष्योन्मुख कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट होते.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, यंत्रणा आणि ऑटोमेशनमुळे आय-टी क्षेत्रात पारंपरिक भूमिका झपाट्याने नष्ट होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आव्हानात्मक ठरत आहे.

टीसीएस च्या या निर्णयामुळे आय-टी उद्योगात भविष्यातील कौशल्यांचा विचार करून बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या