Mann Ki Baat: छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे आपल्या संस्कृतीचे, स्वाभिमानाचे प्रतीक!

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मधून दिला संदेश


नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे आपल्या संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ‘ म्हणून मान्यता दिली. यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रामध्ये आणि एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून दिला.


शिवनेरी, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की, त्यांना भेदणे शत्रूलाही शक्य झाले नाही. खांदेरीचा किल्ला तर सागरामध्ये बनविण्यात आलेला अद्भूत किल्ला आहे. हा किल्ला बनविला जावू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूपक्ष रोखू इच्छित होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतापगडच्या किल्ल्यामध्ये अफजल खानाला पराभवाचे पाणी पाजले होते. त्या पराक्रमांच्या गाथांचा जयजयकार या किल्ल्यांच्या भिंती, बुरूजांमध्ये आजही समावला आहे. विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. हा किल्ला म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, याचे प्रमाण या किल्ल्यामध्ये सापडते. अनेक किल्ले ठाम पणे उभे आहेत. ते फक्त विटा आणि दगड नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. ते संस्कार आणि स्वाभिमान आहेत. मी सर्व देशवासीयांना या किल्ल्यांना भेट देऊन इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन मोदी यांनी केले.


'मन की बात'च्या १२४ व्या आवृत्तीत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'मन की बात पुन्हा एकदा देशाच्या यशाबद्दल, देशवासीयांच्या कामगिरीबद्दल बोलेल.अलिकडच्या काळात देशात, क्रीडा, विज्ञान आणि संस्कृतीमध्ये असे बरेच काही घडले आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. अलिकडच्या काळात, शुभांशू शुक्लाच्या अंतराळातून परतण्याबद्दल बरीच चर्चा झाली. शुभांशू पृथ्वीवर उतरताच संपूर्ण देश आनंद आणि अभिमानाने भरून गेला.’


पंतप्रधान म्हणाले, ‘२१ व्या शतकात भारतात विज्ञान वेगाने प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वी, भारताचे देवेश पंकज, संदीप कुची, देबदत्त प्रियदर्शी आणि उज्ज्वल केसरी यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये पदके जिंकली आणि देशाचे नाव उंचावले. भारत गणिताच्या जगातही आपले स्थान निर्माण करत आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. पुढील महिन्यात, मुंबईत खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाड होणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑलिंपियाड असेल. भारत आता ऑलिंपिक आणि ऑलिंपियाड दोन्हीसाठी पुढे जात आहे.'


जागतिक पोलिस आणि अग्निशमन खेळांमध्ये सुमारे ६०० पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताचे कौतुक केले. आम्ही ७१ देशांमध्ये पहिल्या तीन स्थानांवर पोहोचलो आहोत. पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील क्रीडा-संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल. स्वच्छ भारत मोहिमेचे कौतुक करताना ते म्हणाले की लवकरच या मोहिमेला ११ वर्षे पूर्ण होतील. ते म्हणाले की आता ते एक जनचळवळ बनले आहे. या वर्षी देशातील ४५०० हून अधिक शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सामील झाली आहेत. स्वच्छतेचे उदाहरण देणाऱ्या अनेक संस्था आणि लोकांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

Comments
Add Comment

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान