रोज ५० लाख लिटर पाणी, तरी टँकरवर मदार

महापालिका करणार पाण्याचा हिशोब


विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्याचा प्रकार विरार पश्चिम भागात आमदार राजन नाईक यांनी नुकताच उघडकीस आणला आहे. संबधित सोसायट्यांमध्ये दररोज ५० लाख लिटरहून अधिक पाणी पुरवठा होत असूनसुध्दा टँकरद्वारे पाणी मागविण्यात येत आहे. स्थानिक आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशोब महापालिका प्रशासन घेणार आहे.


विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी रुस्तमजी, एचडीआयएल परिसरातील गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधणे आवश्यक होते. मात्र पालिकेची जागा नसल्याने खासगी जागेवर २० लाख ली. क्षमतेची पाणी टाकी बांधून देण्यासाठी संबंधित विकासकांना पालिकेकडून इमारत बांधकामात 'टीडीआर' वाढवून देण्यात आला.


८ ते १० वर्षांपासून टोलेजंग इमारती उभ्या असतानाही त्या ठिकाणी पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता. आता ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिदिन ५० लाख ली.हून अधिक पाणीपुरवठा या परिसरात करण्यात येत आहे.


असे असतानाही मागील दोन-तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. मुबलक पाणी असतानाही केवळ टँकर माफियांना फायदा व्हावा यासाठी हे सुरू आहे अशा तक्रारी अनेक रहिवाशांनी आ. राजन नाईक यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी व्हॉल्वची तपासणी केली. त्यावेळी वॉलमनकडून फक्त ५० टक्केच वॉल उघडली जात असल्याचे उजेडात आले. टँकर माफीयांचा फायदा व्हावा यासाठीच हे केले जात असल्याने या ठिकाणी पालिकेने त्यांचे वॉलमन नेमण्याची तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई