रोज ५० लाख लिटर पाणी, तरी टँकरवर मदार

महापालिका करणार पाण्याचा हिशोब


विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्याचा प्रकार विरार पश्चिम भागात आमदार राजन नाईक यांनी नुकताच उघडकीस आणला आहे. संबधित सोसायट्यांमध्ये दररोज ५० लाख लिटरहून अधिक पाणी पुरवठा होत असूनसुध्दा टँकरद्वारे पाणी मागविण्यात येत आहे. स्थानिक आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशोब महापालिका प्रशासन घेणार आहे.


विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी रुस्तमजी, एचडीआयएल परिसरातील गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधणे आवश्यक होते. मात्र पालिकेची जागा नसल्याने खासगी जागेवर २० लाख ली. क्षमतेची पाणी टाकी बांधून देण्यासाठी संबंधित विकासकांना पालिकेकडून इमारत बांधकामात 'टीडीआर' वाढवून देण्यात आला.


८ ते १० वर्षांपासून टोलेजंग इमारती उभ्या असतानाही त्या ठिकाणी पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता. आता ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिदिन ५० लाख ली.हून अधिक पाणीपुरवठा या परिसरात करण्यात येत आहे.


असे असतानाही मागील दोन-तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. मुबलक पाणी असतानाही केवळ टँकर माफियांना फायदा व्हावा यासाठी हे सुरू आहे अशा तक्रारी अनेक रहिवाशांनी आ. राजन नाईक यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी व्हॉल्वची तपासणी केली. त्यावेळी वॉलमनकडून फक्त ५० टक्केच वॉल उघडली जात असल्याचे उजेडात आले. टँकर माफीयांचा फायदा व्हावा यासाठीच हे केले जात असल्याने या ठिकाणी पालिकेने त्यांचे वॉलमन नेमण्याची तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना