रोज ५० लाख लिटर पाणी, तरी टँकरवर मदार

महापालिका करणार पाण्याचा हिशोब


विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्याचा प्रकार विरार पश्चिम भागात आमदार राजन नाईक यांनी नुकताच उघडकीस आणला आहे. संबधित सोसायट्यांमध्ये दररोज ५० लाख लिटरहून अधिक पाणी पुरवठा होत असूनसुध्दा टँकरद्वारे पाणी मागविण्यात येत आहे. स्थानिक आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशोब महापालिका प्रशासन घेणार आहे.


विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी रुस्तमजी, एचडीआयएल परिसरातील गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधणे आवश्यक होते. मात्र पालिकेची जागा नसल्याने खासगी जागेवर २० लाख ली. क्षमतेची पाणी टाकी बांधून देण्यासाठी संबंधित विकासकांना पालिकेकडून इमारत बांधकामात 'टीडीआर' वाढवून देण्यात आला.


८ ते १० वर्षांपासून टोलेजंग इमारती उभ्या असतानाही त्या ठिकाणी पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता. आता ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिदिन ५० लाख ली.हून अधिक पाणीपुरवठा या परिसरात करण्यात येत आहे.


असे असतानाही मागील दोन-तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. मुबलक पाणी असतानाही केवळ टँकर माफियांना फायदा व्हावा यासाठी हे सुरू आहे अशा तक्रारी अनेक रहिवाशांनी आ. राजन नाईक यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी व्हॉल्वची तपासणी केली. त्यावेळी वॉलमनकडून फक्त ५० टक्केच वॉल उघडली जात असल्याचे उजेडात आले. टँकर माफीयांचा फायदा व्हावा यासाठीच हे केले जात असल्याने या ठिकाणी पालिकेने त्यांचे वॉलमन नेमण्याची तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या