१४ हजार पुरुषांनी ‘लाडक्या बहिणींचा’ निधी पळविला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वसुलीचा इशारा


पुणे : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. कधी निधीचा अभाव, तर कधी योजनेचे निकष यावरून ही योजना राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे. अशातच राज्यातील १४,२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.


गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या योजनेवर पुरुषांनी कसा डल्ला मारला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचा’ इशारा दिला आहे.


लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी करताना १४,२९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. सरकारला लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी ४२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. १४,२९८ पुरुष योजनेचा लाभ घेत होते, असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा १५०० रुपये मानधन बंद करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांच्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे आता हे पैसे सरकार परत घेणार का? असा प्रश्न विचारला जात होता.


यावर अजित पवार यांनी पैसे वसूल करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांना कोणी घुसवले, छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा, त्यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता, आणखीही गंभीर बाबी समोर आल्या.


सहकार्य न केल्यास कारवाई
गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल करू. जर त्यांनी सहकार्य केले नाही, तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असा इशारा अजित पवार यांनी दिला.


८ लाख कुटुंबांतील २ पेक्षा अधिक महिलांना लाभ
एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असा नियम असताना एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची ७ लाख ९७ हजार ७५१ प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकरणांतील महिलांना लाभार्थींच्या यादीतून वगळण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण त्यांना आतापर्यंत १,१९६ कोटी ६२ लाख रुपये मिळाले.


अपात्र लाभार्थ्यांना बाजूला करणार


ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. त्यानंतर सरकारने ही योजना सुरूच राहणार असल्याचे म्हटले. मात्र काही महिलांनी योजनेच्या अटीचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतला. अनेक ठिकाणी ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे वर्षभरापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरूच आहे. तिजोरीवर ताण पडत असल्याने सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांना बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांनी पोलखोल करताच संजय राऊतांची जीभ घसरली, वाहिली शिव्यांची लाखोली; पहा नेमकं काय झालं?

भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र

पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार! लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने

मराठवाड्यातील मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर राहण्याचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकू निर्देशळ घातला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून

कर्जबाजारीपणामुळे पत्नीची विहिरीत उडी, दुसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास !

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका

Rain updates : राज्यात पावसाचा कहर कायम! मराठवाड्यावर अस्मानी संकट, पुढील दोन दिवस धोक्याचे; वाचा पावसाचे सर्व अपडेट्स

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार

अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन

बारामती : कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन