झारखंडमध्ये तीन नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त


गुमला : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावादाग जंगलात पोलीस आणि सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत बंदी घातलेल्या झारखंड जन मुक्ती मोर्चा संघटनेचे तीन नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक एके ४७ रायफल आणि दोन इन्सास रायफल यांच्यासह इतर शस्त्रसाठा जप्त केला. गुमला एसपी हारिश बिन जमां यांनी ही माहिती दिली.


खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीआधारे जंगलात पोलीस आणि सुरक्षा पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. चकमक सुरू झाली. अखेर चकमकीत झारखंड जन मुक्ती मोर्चा संघटनेचे तीन नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने शस्त्रसाठा जप्त केला.


याआधी १५ जुलै रोजी बोकारो जिल्ह्यातील गोमिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरहोर्डेरा जंगलात सीपीआय माओवादी नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी नक्षलवादी कुंवर मांझीसह दोन नक्षलवाद्यांना ठार मारले होते. कुंवर मांझीवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. बिरहोर्डेरा जंगलातील चकमकीत कोब्रा २०९ बटालियनचा एक जवान हुतात्मा झाला.


झारखंड पोलिसांनी या वर्षी राज्य नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. झारखंडमध्ये २०२५ च्या सुरुवातीपासून पोलिसांनी २२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या काळात नक्षलवाद्यांकडून ११५ शस्त्रे, ८५९१ गोळ्या, १७६.५ किलो स्फोटके आणि ४,५१,०४७ रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, १७९ आयईडी शोधून निष्क्रिय करण्यात आले. नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांची ही एक मोठी कारवाई आहे.


Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या