झारखंडमध्ये तीन नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त


गुमला : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावादाग जंगलात पोलीस आणि सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत बंदी घातलेल्या झारखंड जन मुक्ती मोर्चा संघटनेचे तीन नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक एके ४७ रायफल आणि दोन इन्सास रायफल यांच्यासह इतर शस्त्रसाठा जप्त केला. गुमला एसपी हारिश बिन जमां यांनी ही माहिती दिली.


खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीआधारे जंगलात पोलीस आणि सुरक्षा पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. चकमक सुरू झाली. अखेर चकमकीत झारखंड जन मुक्ती मोर्चा संघटनेचे तीन नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने शस्त्रसाठा जप्त केला.


याआधी १५ जुलै रोजी बोकारो जिल्ह्यातील गोमिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरहोर्डेरा जंगलात सीपीआय माओवादी नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी नक्षलवादी कुंवर मांझीसह दोन नक्षलवाद्यांना ठार मारले होते. कुंवर मांझीवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. बिरहोर्डेरा जंगलातील चकमकीत कोब्रा २०९ बटालियनचा एक जवान हुतात्मा झाला.


झारखंड पोलिसांनी या वर्षी राज्य नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. झारखंडमध्ये २०२५ च्या सुरुवातीपासून पोलिसांनी २२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या काळात नक्षलवाद्यांकडून ११५ शस्त्रे, ८५९१ गोळ्या, १७६.५ किलो स्फोटके आणि ४,५१,०४७ रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, १७९ आयईडी शोधून निष्क्रिय करण्यात आले. नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांची ही एक मोठी कारवाई आहे.


Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर