Rule Change : सर्वसामान्यांच्या खिशावर कात्री! १ ऑगस्टपासून ‘हे’ नियम बदलणार

मुंबई : सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून अनेक नियम बदलणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून तसेच बँका, वाहन क्षेत्र आणि वित्तीय संस्थांकडून काही नवे नियम लागू होणार असून, यामुळे तुमच्या खिशावरचा भार आणखी वाढणार आहे. पेट्रोल, एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. तसेच UPI पेमेंटबद्दलही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या सर्व बदलांची माहिती..




क्रेडिट कार्ड


SBIच्या क्रेडिट कार्डधाकरकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ११ ऑगस्टपासून एसबीआय अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मोफत हवाई अपघात विमा बंद करणार आहे. पीएसबी, युको बँक, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक, अलाहाबाद बँक आणि SBI काही एलिट आणि प्राइम कार्डवर १ कोटी किंवा ५० लाखांचे कव्हर देत असे, पण आता मात्र ते मिळणार नाही.




LPG गॅस दरात बदल 


प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी किंवा व्यावसायिक सिलेंडरच्या किमती बदलतात. त्यामुळे आताही त्यात बदल होण्याची शक्यता आहे. १ जुलै रोजी व्यावसायिक सिलेंडर ६० रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यामुळे आता १ तारखेला ही किंमत बदलणार की तशीच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या घरगुती ग्राहकांना आणखी तडाखा बसण्याची शक्यता.



UPI चे नियम बदलणार


१ ऑगस्टपासून UPIचे नियम बदलत आहेत. पेटीएम, फोनपे, जीपे किंवा इतर प्लॅटफॉर्मचा वापऱ्यांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही नवीन नियम आणले आहेत. यानुसार तुम्ही तुमच्या यूपीआय ॲपवरून दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करू शकणार आहेत. तसेच ऑटोपे व्यवहार आता फक्त सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतर करता येणार आहे. यासह इतरही काही बदल होणार असल्याची माहिती आहे.



सीएनजी-पीएनजीच्या किमतीत बदल


सीएनजी-पीएनजीच्या किमतीतही १ तारखेला बदल होत असतो, मात्र एप्रिलपासून या किंमती स्थिर आहेत. मात्र आता त्यात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या किमती वाढल्यास सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.



एटीएफच्या किमती


एअर टर्बाइन फ्युएल (विमानाचे इंधन) च्या किमतीत १ ऑगस्टपासून बदल होऊ शकतो. याच्या किमती वाढल्या तर विमानाच्या तिकीटाच्या किमती वाढू शकतात. तसेच इंधनाची किंमत कमी झाली तर विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी