Kolhapur: राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने रात्री क्रमांक सहाचा दरवाजा खुला झाला


कोल्हापूर: राधानगरी येथील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून २ हजार ८५६ व विज निर्मितीसाठी १ हजार ५०० असे ४ हजार ३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. भोगावती व पंचगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल धरणाची पाणीपातळी ९९ टक्क्यांवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी रात्री उशिरा दहा वाजता धरणाचा स्वयंचलीत दरवाजा उघडण्यात आला.


सध्या धरणातून विजगृहासाठी १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजे उघडल्यामुळे विसर्गात मोठी वाढ झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आणि विसर्ग वाढीमुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचेआणखीन दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. पावसाचा जोर आणि धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.



धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी


कालपासून  पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळत आहेत. आज सकाळी शहरातही हलक्या सरी पडल्या. काल दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. दरम्यान, जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. यामध्ये कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे १८ फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी २० फूट सहा इंचांवर पोहोचली. अद्याप पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्यासह सहा, दूधगंगा नदीवरील एक, वारणा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना