Kolhapur: राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने रात्री क्रमांक सहाचा दरवाजा खुला झाला


कोल्हापूर: राधानगरी येथील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून २ हजार ८५६ व विज निर्मितीसाठी १ हजार ५०० असे ४ हजार ३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. भोगावती व पंचगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल धरणाची पाणीपातळी ९९ टक्क्यांवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी रात्री उशिरा दहा वाजता धरणाचा स्वयंचलीत दरवाजा उघडण्यात आला.


सध्या धरणातून विजगृहासाठी १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजे उघडल्यामुळे विसर्गात मोठी वाढ झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आणि विसर्ग वाढीमुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचेआणखीन दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. पावसाचा जोर आणि धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.



धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी


कालपासून  पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळत आहेत. आज सकाळी शहरातही हलक्या सरी पडल्या. काल दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. दरम्यान, जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. यामध्ये कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे १८ फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी २० फूट सहा इंचांवर पोहोचली. अद्याप पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्यासह सहा, दूधगंगा नदीवरील एक, वारणा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक