APY Scheme:अटल पेंशन योजनेला तुंबळ प्रतिसाद थेट सबस्क्राईबरमध्ये 'इतक्या' कोटींवर

प्रतिनिधी: सरकारच्या एपीवाय महत्वकांक्षी योजनेला तुंबळ प्रतिसाद मिळाल्याचे निश्चित झाले आहे. अटल पेंशन योजना (APY) या सामाजिक आर्थिक सुरक्षेच्या धोरणाला जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. या योजनेच्या लाभार्थीं संख्या ८ कोटीचा टप्पा पार केला आहे. एकूणच नवे ३९ लाख लाभार्थी या योजनेशी जोडले गेलेत असे सरकारने म्हटले आहे. तशी माहिती सरकारने नुकतीच दिली. पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) या सरकारी संस्थेने या योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्याने योजने ला अपवादात्मक यश मिळाले. आर्थिक वर्ष २०२५-२६ या वर्षात योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली. प्रामुख्याने योजनेची जनजागृती, सरकार, वित्त नियामक मंडळांचे अविरत प्रयत्न या कारणांमुळे योजनेला यश प्राप्त झाले आहे. समाजातील मोठ्या प्रमाणा तील एक स्तर आर्थिक सुरक्षेपा सून वंचित होता त्यांच्यासाठी सरकारने अटल पेंशन योजना २०१५ साली सरकारने सुरु केली होती. असंघटित क्षेत्रातील तरूणांना, कामगारांना, व कष्टकरी, वंचितांना त्यांच्या वाढत्या वयाबरोबर सामाजिक सुरक्षा आर्थिक दृष्टीने मि ळावी यासाठी सरकारने योजना आणली.

या योजनेअंतर्गत दरमहा ठराविक रक्कम वयाच्या ६० व्या वर्षांनंतर मिळते. जसे दरमहा बचतीतून भरलेले योगदान असेल त्या १००० ते ५००० रूपये प्रमाणात दरमहा रक्कम ६० वयानंतर मिळेल अशी ही योजना होती. विशेषतः ही योजना बचतीच्या सवयीला प्रो त्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केली होती ज्याला मोठा प्रतिसाद देशभरातील नागरिकांनी दिला आहे. जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास तर त्यांच्या पती पत्नी अथवा कुटुंबला त्या रक्कमेचा मुदत संपल्यानंतर परतावा (Returns) या योजनेअंतर्गत मिळतात. १८ ते ४० वयोगटातील कर न भरणाऱ्या नागरिक यासाठी पात्र असतील. जर भरलेला कॉर्पस ठरलेल्या किमान रकमेपेक्षा कमी जमत असेल तर त्यात वाढीव रक्कम सरकार गुंतवून त्याचा परतावा पात्र लाभार्थ्यांना मिळेल असे या योजनेचे प्रारूप आहे.
Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे 'टॅरिफ युद्ध' थंडावणार?

चीन अमेरिकेचे कृषी, ऊर्जा उत्पादन खरेदी करणार; फेंटॅनाईल संकटावर मदत करण्याचे आश्वासन ग्योंगजू (दक्षिण कोरिया):

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ: