AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी १९ फेब्रुवारीपासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एसी लोकलसोबतच प्रशासनाने ३ नवीन नॉन-एसी (साध्या) लोकल फेऱ्यादेखील वाढवल्या आहेत. या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४१४ वर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाचे विविध आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. १९ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी गतिमान आणि आरामदायी होणार आहे.



पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारही धावणार जादा एसी लोकल


पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या लोकल सेवेत मोठे बदल केले असून, एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता एसी लोकलची एकूण संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. यामध्ये ११ साध्या लोकलच्या जागी एसी सेवा सुरू करण्यात येणार असून, एक पूर्णपणे नवीन एसी फेरी वाढवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या एसी लोकलची संख्या आता ७७ वरून थेट १०६ करण्यात आली आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येईल. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या आता १४१० वरून १४१४ झाली आहे. वांद्रे ते भाईंदर दरम्यान धावणारी लोकल आता थेट विरारपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे विरारच्या प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हे सर्व बदल १९ फेब्रुवारीपासून लागू होणार असून, यामुळे कार्यालयीन वेळेसह सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र