AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी १९ फेब्रुवारीपासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एसी लोकलसोबतच प्रशासनाने ३ नवीन नॉन-एसी (साध्या) लोकल फेऱ्यादेखील वाढवल्या आहेत. या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४१४ वर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाचे विविध आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. १९ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी गतिमान आणि आरामदायी होणार आहे.



पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारही धावणार जादा एसी लोकल


पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या लोकल सेवेत मोठे बदल केले असून, एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता एसी लोकलची एकूण संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. यामध्ये ११ साध्या लोकलच्या जागी एसी सेवा सुरू करण्यात येणार असून, एक पूर्णपणे नवीन एसी फेरी वाढवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या एसी लोकलची संख्या आता ७७ वरून थेट १०६ करण्यात आली आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येईल. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या आता १४१० वरून १४१४ झाली आहे. वांद्रे ते भाईंदर दरम्यान धावणारी लोकल आता थेट विरारपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे विरारच्या प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हे सर्व बदल १९ फेब्रुवारीपासून लागू होणार असून, यामुळे कार्यालयीन वेळेसह सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Railway : CSMT ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार भुयारी रेल्वे करणार

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर