बापरे! लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर लाडक्या भावांचा डल्ला, आता काय करणार सरकार?

तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला महिन्याला १५०० रुपयांचा लाभ


मुंबई: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास १४,२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांच्या खात्यात दर महिन्याला लाडकी बहिणीचे हफ्ते जमा होत होते. यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


लाडकी बहीण योजनेवर सरकारला वर्षभरात ४२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातील जवळपास २१.४४ कोटी रुपये पुरुषांच्या खात्यात जमा झाले असल्याकारणामुळे, सरकारला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. मुख्यत्वेकरून ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु केली होती. मात्र, याचा फायदा लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या भावांनाच होत असल्याचे निदर्शनास आल्याने मोठा धक्काच बसला आहे.


त्याचप्रमाणे ६५ वर्षे वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असा देखील नियम आहे. कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ दिला जातो. असे असतानाही ६५ वर्षे वयावरील २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शनास आले आहे. त्यांना १० महिन्यांपर्यंत ४३१ कोटी ७० लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.आता हे लाभार्थी गाळले जाणार आहेत.



दहा महिने पुरुष योजनेचा लाभ घेत आहे


ऑगस्ट २०२४ पासून लाभार्थी महिलांना लाडकी बाहीने योजनेचा लाभ मिळत आहे. त्यानुसार, ऑगस्ट ते जून असे १० महिने हफ्ते मिळाले असून, हे सर्व हफ्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात नसून तर लाडक्या भावाच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत डेट्याची पडताळणी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.



पुरुष असूनही महिलांच्या नावाने पैसे घेतले 


आणखी एक धक्कादायक म्हणजे, २ लाख ३६ हजार ०१४ लाभार्थी असे आहेत की, ज्यांच्या नावांबद्दल असा संशय आहे की, पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा. त्याची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४,२९८ पुरुष योजनेचा लाभ घेत होते, असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा १५०० रुपये मानधन बंद करण्यात आले आहे. पूर्णत: अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०