इंग्लंडच्या ज्यो रूटने मँचेस्टरच्या मैदानात रचला इतिहास, असे करणारा ठरलाय पहिला फलंदाज

  40

मँचेस्टर: इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने नव-नवे रेकॉर्ड्स बनवत आहेत. आता ३४ वर्षीय ज्यो रूटने मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एक खास रेकॉर्ड बनवला आहे.


ज्यो रूट जगातील असा पहिला फलंदाज बनला आहे ज्याने या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा केल्या आहेत. ज्यो रूटने भारताविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या दिवशी ही कामगिरी केली आहे. या सामन्याच्या आधी ज्यो रूटने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये ६५.२०च्या सरासरीने ९७८ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश होता.


ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ज्यो रूटनंतर सर्वाधिक धावा इंग्लंडच्या ही डेनिस कॉम्पटनने बनवल्या आहेत. या मैदानावर कॉम्पन यांनी ८१८ धावा केल्या होत्या. ज्यो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पन्नासहून अधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १०४ वेळा ५० अथवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग(१०३)ला मागे टाकले आहे.



कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० प्लस स्कोर


११९- सचिन तेंडुलकर
१०४- ज्यो रूट
१०३- रिकी पाँटिंग
१०३- जॅक्स कॅलिस
९९- राहुल द्रविड

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र