Asia Cup 2025: सप्टेंबरमध्ये येऊ शकतात भारत-पाकिस्तान आमने सामने

ढाका: ऑपरेशन सिंदूरनंतर आता काही महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा पाहता येण्याची शक्यता आहे. हे सामने आशिया कप २०२५ मध्ये खेळवले जातील. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप २०२५ चे आयोजन भारताकडे सोपवले आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये युएई मध्ये खेळवली जाईल. गुरुवारी ढाका येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सर्व २५ सदस्य देश सहभागी झाले होते.बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तानने २०२७ पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. प्रसारक आणि प्रायोजकांच्या मागणीचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवता येईल. यामुळे ३ सामने होतील. प्रथम लीग टप्प्यात, नंतर सुपर सिक्समध्ये किमान एक सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तिसरा सामनादेखील शक्य आहे.

आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व आशिया कप १९८४ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत १६ वेळा आयोजित करण्यात आला आहे. भारताने सर्वाधिक म्हणजे ८ वेळा विजेतेपद जिंकले आहे, तर श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भारतात होणारा महिला एकदिवसीय विश्वचषक हा हायब्रिड मॉडेलवर खेळवला जात आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत भारत-पाक महिला संघ लीगमध्ये एकमेकांसमोर येतील. त्याच वेळी, २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात, भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघ लीग दरम्यान भिडतील.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले होते, इतकेच नाही तर सेमीफायनल आणि फायनल देखील यूएईमध्येच झाला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद जिंकले.
Comments
Add Comment

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि

Hardik Pandya Century : पांड्या इज बॅक! ६ चेंडूत ३४ धावा अन् करिअरमधील पहिलं वादळी शतक; पाहा धडाकेबाज शतकाचा Video

राजकोट : भारतीय क्रिकेट संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघ