Asia Cup 2025: सप्टेंबरमध्ये येऊ शकतात भारत-पाकिस्तान आमने सामने

ढाका: ऑपरेशन सिंदूरनंतर आता काही महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा पाहता येण्याची शक्यता आहे. हे सामने आशिया कप २०२५ मध्ये खेळवले जातील. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप २०२५ चे आयोजन भारताकडे सोपवले आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये युएई मध्ये खेळवली जाईल. गुरुवारी ढाका येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सर्व २५ सदस्य देश सहभागी झाले होते.बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तानने २०२७ पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. प्रसारक आणि प्रायोजकांच्या मागणीचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवता येईल. यामुळे ३ सामने होतील. प्रथम लीग टप्प्यात, नंतर सुपर सिक्समध्ये किमान एक सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तिसरा सामनादेखील शक्य आहे.

आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व आशिया कप १९८४ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत १६ वेळा आयोजित करण्यात आला आहे. भारताने सर्वाधिक म्हणजे ८ वेळा विजेतेपद जिंकले आहे, तर श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भारतात होणारा महिला एकदिवसीय विश्वचषक हा हायब्रिड मॉडेलवर खेळवला जात आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत भारत-पाक महिला संघ लीगमध्ये एकमेकांसमोर येतील. त्याच वेळी, २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात, भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघ लीग दरम्यान भिडतील.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले होते, इतकेच नाही तर सेमीफायनल आणि फायनल देखील यूएईमध्येच झाला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद जिंकले.
Comments
Add Comment

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि