Asia Cup 2025: सप्टेंबरमध्ये येऊ शकतात भारत-पाकिस्तान आमने सामने

ढाका: ऑपरेशन सिंदूरनंतर आता काही महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा पाहता येण्याची शक्यता आहे. हे सामने आशिया कप २०२५ मध्ये खेळवले जातील. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप २०२५ चे आयोजन भारताकडे सोपवले आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये युएई मध्ये खेळवली जाईल. गुरुवारी ढाका येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सर्व २५ सदस्य देश सहभागी झाले होते.बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तानने २०२७ पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. प्रसारक आणि प्रायोजकांच्या मागणीचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवता येईल. यामुळे ३ सामने होतील. प्रथम लीग टप्प्यात, नंतर सुपर सिक्समध्ये किमान एक सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तिसरा सामनादेखील शक्य आहे.

आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व आशिया कप १९८४ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत १६ वेळा आयोजित करण्यात आला आहे. भारताने सर्वाधिक म्हणजे ८ वेळा विजेतेपद जिंकले आहे, तर श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भारतात होणारा महिला एकदिवसीय विश्वचषक हा हायब्रिड मॉडेलवर खेळवला जात आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत भारत-पाक महिला संघ लीगमध्ये एकमेकांसमोर येतील. त्याच वेळी, २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात, भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघ लीग दरम्यान भिडतील.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले होते, इतकेच नाही तर सेमीफायनल आणि फायनल देखील यूएईमध्येच झाला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद जिंकले.
Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली