Asia Cup 2025: सप्टेंबरमध्ये येऊ शकतात भारत-पाकिस्तान आमने सामने

ढाका: ऑपरेशन सिंदूरनंतर आता काही महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा पाहता येण्याची शक्यता आहे. हे सामने आशिया कप २०२५ मध्ये खेळवले जातील. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप २०२५ चे आयोजन भारताकडे सोपवले आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये युएई मध्ये खेळवली जाईल. गुरुवारी ढाका येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सर्व २५ सदस्य देश सहभागी झाले होते.बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तानने २०२७ पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. प्रसारक आणि प्रायोजकांच्या मागणीचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवता येईल. यामुळे ३ सामने होतील. प्रथम लीग टप्प्यात, नंतर सुपर सिक्समध्ये किमान एक सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तिसरा सामनादेखील शक्य आहे.

आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व आशिया कप १९८४ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत १६ वेळा आयोजित करण्यात आला आहे. भारताने सर्वाधिक म्हणजे ८ वेळा विजेतेपद जिंकले आहे, तर श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भारतात होणारा महिला एकदिवसीय विश्वचषक हा हायब्रिड मॉडेलवर खेळवला जात आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत भारत-पाक महिला संघ लीगमध्ये एकमेकांसमोर येतील. त्याच वेळी, २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात, भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघ लीग दरम्यान भिडतील.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले होते, इतकेच नाही तर सेमीफायनल आणि फायनल देखील यूएईमध्येच झाला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद जिंकले.
Comments
Add Comment

फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि

T20 World Cup 2026 Final Match : जाणून घ्या जिंकणाऱ्या संघाला किती कोटी मिळणार?

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद

Lea Tahuhu : न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहू एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या