Kolhapur Accident: महाविद्यालयीन मुलींच्या घोळक्यात घुसली कार, एकीचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी

कोल्हापुर: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकीनं महाविद्यालयीन विद्यार्थीनींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कुरुकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँड इथं ही घटना घडली आहे. या चारचाकीच्या धडकेत एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. तर 3 विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रज्ञा दशरथ कांबळे ( वय १८) असं मृत्यू झालेल्या कौलवं येथील विद्यार्थीनीचं नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



नेमकं काय घडलं?


कॉलेज संपल्यानंतर बस स्टँडवर उभारलेल्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसल्यानं हा अपघात झाला. दरम्यान, या घटनेनंतर कारचालकासह दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळासह सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.


दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चालकाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. नेमका हा प्रकार घडला कसा याचीही पोलिस चौकशी करत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या मुलींवर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना