'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेत २८ आणि २९ जुलैला होणार चर्चा

मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर २८ आणि २९ जुलै असे दोन दिवस चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात सोमवारी लोकसभेत आणि त्यानंतर मंगळवारी राज्यसभेत चर्चा होईल. या चर्चेसाठी सरकारने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना प्रत्येकी 16 तासांचा वेळ दिला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारने चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला असला तरी, विरोधकांनी उद्यापासूनच चर्चा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचे कारण देत सरकारने ही मागणी फेटाळली.


गेल्या आठवड्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी वाढताना पाहायला मिळत होती. ज्यामध्ये विरोधी पक्षाच्या खासदार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि बिहारमधील स्पेशल इन्टेन्शिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्सवर उत्तरे देण्याची मागणी केली होती. तसेच विरोधकांनी वेगवेगळ्या नियमांच्या अंतर्गत विविध प्रश्नांवर कमी कालावधीच्या चर्चा घेण्याचीही मागणी केली आहे. तसेच नियमित चर्चेसाठी कामकाज सल्लागार समितीची दर आठवड्याला बैठक घेण्याची मागणीही केली आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे