'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेत २८ आणि २९ जुलैला होणार चर्चा

मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर २८ आणि २९ जुलै असे दोन दिवस चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात सोमवारी लोकसभेत आणि त्यानंतर मंगळवारी राज्यसभेत चर्चा होईल. या चर्चेसाठी सरकारने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना प्रत्येकी 16 तासांचा वेळ दिला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारने चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला असला तरी, विरोधकांनी उद्यापासूनच चर्चा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचे कारण देत सरकारने ही मागणी फेटाळली.


गेल्या आठवड्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी वाढताना पाहायला मिळत होती. ज्यामध्ये विरोधी पक्षाच्या खासदार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि बिहारमधील स्पेशल इन्टेन्शिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्सवर उत्तरे देण्याची मागणी केली होती. तसेच विरोधकांनी वेगवेगळ्या नियमांच्या अंतर्गत विविध प्रश्नांवर कमी कालावधीच्या चर्चा घेण्याचीही मागणी केली आहे. तसेच नियमित चर्चेसाठी कामकाज सल्लागार समितीची दर आठवड्याला बैठक घेण्याची मागणीही केली आहे.

Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी