बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण : आरसीबी-केएससीएवर कारवाई होणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

  72

बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती जॉन मायकल डी'कुन्हा यांचा अहवाल स्वीकारला आहे. ४ जून रोजी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.


कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले की, मंत्रिमंडळाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या खाजगी संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, 'न्यायाधीश जॉन मायकल डी'कुन्हा यांचा अहवाल स्वीकारण्याचा आणि त्यावर आधारित कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.'


खाजगी संघटना, आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स सारख्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांच्या बाबतीत विभागीय चौकशी सुरू केली जाईल असे मंत्र्यांनी सांगितले. न्यायमूर्ती डी'कुन्हा यांच्या अहवालात चेंगराचेंगरी आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांची नावे देण्यात आली आहेत.


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. चेंगराचेंगरीनंतर बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि अतिरिक्त आयुक्त विकास कुमार विकास यांना निलंबित करण्यात आले होते. आयपीएलमधील यशस्वी मोहिमेनंतर आरसीबी फ्रँचायझीने आयोजित केलेल्या विजय मिरवणूकी दरम्यान ही घटना घडली होती. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली होती.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी