बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण : आरसीबी-केएससीएवर कारवाई होणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती जॉन मायकल डी'कुन्हा यांचा अहवाल स्वीकारला आहे. ४ जून रोजी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.


कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले की, मंत्रिमंडळाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या खाजगी संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, 'न्यायाधीश जॉन मायकल डी'कुन्हा यांचा अहवाल स्वीकारण्याचा आणि त्यावर आधारित कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.'


खाजगी संघटना, आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स सारख्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांच्या बाबतीत विभागीय चौकशी सुरू केली जाईल असे मंत्र्यांनी सांगितले. न्यायमूर्ती डी'कुन्हा यांच्या अहवालात चेंगराचेंगरी आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांची नावे देण्यात आली आहेत.


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. चेंगराचेंगरीनंतर बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि अतिरिक्त आयुक्त विकास कुमार विकास यांना निलंबित करण्यात आले होते. आयपीएलमधील यशस्वी मोहिमेनंतर आरसीबी फ्रँचायझीने आयोजित केलेल्या विजय मिरवणूकी दरम्यान ही घटना घडली होती. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली होती.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या