राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० जिल्हाध्यक्षांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केल्याचे समजते. प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जिल्हाध्यक्ष सांगत आहेत.

"शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील. तसेच, विकासाच्या कामातही मदत होईल", असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला. लवकरच हे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

महायुतीचे महामंडळांसाठीचे सूत्र निश्चित

महायुतीने महामंडळांसाठीचे सूत्र निश्चित केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ४४, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला ३३ आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २३ महामंडळं आली आहेत.
Comments
Add Comment

Hdfc Bank: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा मजबूत तिमाही निकाल बँकेच्या निव्वळ नफ्यात ११% वाढ

मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

लवकरच बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कारवाई होणार, मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई : राज्यातील २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. मुंबईसह २१ महापालिकांमध्ये भाजप तर ठाणे आणि

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

३०००० कोटी मालमत्तेतील वाद शिगेला? करिष्मा कपूरला दोन आठवड्यात खुलासा करण्याचे न्यायालयाकडून आदेश

नवी दिल्ली: करिष्मा कपूर व प्रिया कपूर यांच्यातील मालमत्तेतील वाद आता नव्या उंचीवर पोहोचवण्याची शक्यता वर्तवली