राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० जिल्हाध्यक्षांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केल्याचे समजते. प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेना प्रवेशाची तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जिल्हाध्यक्ष सांगत आहेत.

"शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील. तसेच, विकासाच्या कामातही मदत होईल", असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला. लवकरच हे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

महायुतीचे महामंडळांसाठीचे सूत्र निश्चित

महायुतीने महामंडळांसाठीचे सूत्र निश्चित केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ४४, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला ३३ आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २३ महामंडळं आली आहेत.
Comments
Add Comment

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल