बांग्लादेश विमान अपघातातील बळींना मदत करण्यासाठी युनूस सरकारची पोस्ट, लोक भडकताच पोस्ट केली डीलिट

ढाका: बांग्लादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या विमान अपघातानंतर या अपघातातील मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देशाचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी फेसबुक पोस्टद्वारे देशवासीयांना दान देण्याचे आवाहन केले होते. मात्र, युनूस यांच्या या पोस्टमुळे बांग्लादेशमध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला. अपघातातील बळींना मदत करण्यासाठी युनूस सरकारकडे पैसे नसल्यावरुन अनेकांनी टीका केली. हा वाद इतका वाढला की, मोहम्मद युनूस यांना ही फेसबुक पोस्ट ताबडतोब डिलीट करावी लागली.

मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नागरिकांना "मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधी" मध्ये देणगी देण्याचे आवाहन केले होते.मीडिया रिपोर्टनुसार, ही पोस्ट २२ जुलै २०२५ रोजी दुपारी २:०० नंतर टाकण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट मोहम्मद युनूस यांचे वरिष्ठ सहाय्यक प्रेस सचिव फयज अहमद यांनी प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील शेअर केली होती.ज्यामुळे ही पोस्ट अधिकृत खात्यातूनच केली गेली होती यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विमान दुर्घटनेनंतरच्या या पोस्टवर अनेक लोकांनी युनूस सरकारवर टीका केली. अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही का? असा सवालही उपस्थित करण्यात आला.अनेक राजकीय पक्षांसह सामान्य लोकांनी युनूसवर हल्लाबोल केला. हा वाद इतका वाढला की शेवटी कोणतेही कारण न देता मोहम्मद युनूस यांनी तात्काळ ती फेसबुक पोस्ट हटवली.
Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल