वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

बीड : राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.


या सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आरोपी कराडने देशमुख खून खटल्यातून मला दोषमुक्त करावे, असा अर्ज सादर केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरा आरोपी विष्णू चाटे यासह इतर सर्व आरोपींनीही आम्हाला या खटल्यातून वगळण्यात यावे, दोषमुक्त करण्यात यावे, असे अर्ज न्यायालयात सादर केले होते. या सर्व अर्जांवर आम्ही जोरदार हरकत घेतली. न्यायालयाला हे स्पष्टपणे सांगितले की, ही आरोपींची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. खटल्यात विलंब करण्याची आणि वेळेचा अपव्यय करण्याची एक पद्धत आहे.

Comments
Add Comment

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या