वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

बीड : राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.


या सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आरोपी कराडने देशमुख खून खटल्यातून मला दोषमुक्त करावे, असा अर्ज सादर केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरा आरोपी विष्णू चाटे यासह इतर सर्व आरोपींनीही आम्हाला या खटल्यातून वगळण्यात यावे, दोषमुक्त करण्यात यावे, असे अर्ज न्यायालयात सादर केले होते. या सर्व अर्जांवर आम्ही जोरदार हरकत घेतली. न्यायालयाला हे स्पष्टपणे सांगितले की, ही आरोपींची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. खटल्यात विलंब करण्याची आणि वेळेचा अपव्यय करण्याची एक पद्धत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये