कसारा लोकलवर दरड कोसळली

ठाणे  : मुंबईहून कसाऱ्याला येणारी लोकल रात्री ९ वाजताच्या दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात येत असताना प्लॅटफॉर्मसाठी ट्रॅक बदलत असताना ट्रॅक लगत असलेल्या टेकडीवरील दरड लोकलवर कोसळली. यात दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून मोटरमनने सावधगिरीने लोकल कसारा स्थानकात आणली.


मंगळवारी रात्री ९च्या सुमारास मुंबईहून कसारासाठी येणारी लोकल प्लॅटफॉर्म नंबर चारवर येण्यासाठी ट्रॅक बदलत असताना अचानक लोकलवर दरड कोसळली. काही प्रमाणात दरड ही अर्ध्या लोकलमध्ये तर अर्धी दरड ट्रॅकलगत पडली. मातीचा मलबा, छोटे-मोठे दगड व छोटी झाड खाली आली.


या अचानक कोसळलेल्या दरडीमुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी बाळू जाधव, रा. पंचशील नगर, तुकाराम जाधव रा. शिवाजी नगर कसारा हे गंभीर जखमी झाले. या दरडीमुळे गंभीर दुखापत झालेल्या जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीम कसाराचे सदस्य प्रमोद वारंगुसे यांनी लोकलमधील सहप्रवाशांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानकात उपचारासाठी उतरवले.


दरड पडलेल्या घटनेची माहिती रेल्वेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी रेल्वे ट्रॅकवर आलेले दरडीचे दगड बाजूला केले व ९ वाजून २१ मिनिटांनी मुंबईकडे लोकल रवाना  केली.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी