७/११च्या अपिलावर उद्या सुनावणी

निकालात त्रुटी राहिल्याचा राज्य सरकारचा दावा


मुंबई : ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा दावा करत राज्य सरकारने तातडीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली.


राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी ही याचिका तातडीच्या सुनावणीकरिता सादर केली. यावेळी आमची एसएलपी तयार आहे. त्यामुळे गुरुवारी (२४ जुलै) रोजी यावर तातडीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सरन्यायाधीशांकडे करण्यात आली. त्यावर कैदेत असलेल्या ८ आरोपींना कालच्या निकालानंतर कारागृहातून सोडून देण्यात आले. तेव्हा आता इतकी घाई का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. राज्य सरकारची विनंती मान्य करत या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.


या प्रकरणात मुंबई पोलीस आणि एटीएसने केलेल्या तपासावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. यात ५ पैकी ४ आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

Comments
Add Comment

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रस्ताव फेटाळला मुंबई : भारताचे माजी

Aarey Colony : आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून

तेलाच्या टाकीत उतरले आणि काही क्षणांत घडलं भयंकर; जहाजावरील मुख्य अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मुंबईजवळ समुद्रात कार्यरत असलेल्या एका तेलवाहू जहाजावर दुर्दैवी घटना घडली असून जहाजावरील ४३ वर्षीय

Mumbai Andheri Subway Waterlogging : प्रत्येक पावसात अंधेरी सबवे होणार जलमय; पुढील काही वर्ष ही समस्या राहणार कायमच

मुंबई : पावसाचा पहिल्याच कोसळलेल्या सरिंमुळे अंधेरी सबवे परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. काही मिनिटांच्या

Hawkers Plaza Dadar : दादर हॉकर्स प्लाझामध्ये गाळे, तरीही क्यु आर कोडसाठी ठरणार लाभार्थी?

दादर पश्चिमधील फेरीवाल्यांमध्ये जोरदार चर्चा, महापालिका काय घेणार निर्णय मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने

जेम पोर्टलवरून शालेय वस्तुंची खरेदी करताच काँग्रेसला लागल्या मिरच्या

- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी - मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी