७/११च्या अपिलावर उद्या सुनावणी

निकालात त्रुटी राहिल्याचा राज्य सरकारचा दावा


मुंबई : ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा दावा करत राज्य सरकारने तातडीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली.


राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी ही याचिका तातडीच्या सुनावणीकरिता सादर केली. यावेळी आमची एसएलपी तयार आहे. त्यामुळे गुरुवारी (२४ जुलै) रोजी यावर तातडीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून सरन्यायाधीशांकडे करण्यात आली. त्यावर कैदेत असलेल्या ८ आरोपींना कालच्या निकालानंतर कारागृहातून सोडून देण्यात आले. तेव्हा आता इतकी घाई का? असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. राज्य सरकारची विनंती मान्य करत या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.


या प्रकरणात मुंबई पोलीस आणि एटीएसने केलेल्या तपासावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. यात ५ पैकी ४ आरोपींना सुनावण्यात आलेली फाशी तर अन्य आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी