गुडलक कॅफे पुन्हा अडचणीत, आता अंडाभुर्जीमध्ये झुरळ!

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबई-पुणे हायवेवरील त्यांच्या शाखेत अंडाभुर्जीमध्ये चक्क झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, कारण काही दिवसांपूर्वीच फर्ग्युसन रस्त्यावरील त्यांच्या दुसऱ्या शाखेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला होता.


एफडीएच्या कारवाईनंतरही सुधारणा नाही


या आधीच्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता. प्रशासनाने कॅफेला काही सुधारणा पूर्ण करण्यास सांगितले होते, त्यानंतरच त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळणार होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच, गुडलक कॅफेच्या दुसऱ्या शाखेत ही धक्कादायक घटना समोर आली आहे.


ब्रँडच्या प्रतिमेला धक्का, ग्राहकांमध्ये संताप


एकाच ब्रँडच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्यामुळे गुडलक कॅफेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. अन्न तज्ज्ञांच्या मते, ही अत्यंत गंभीर बाब असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अन्न सुरक्षा विभागाने मुंबई-पुणे हायवेवरील शाखेचीही त्वरित चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या दोन्ही घटनांवर गुडलक कॅफे व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या