प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

नालासोपारा : शहराच्या धानीवबाग परिसरात आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरातच पुरण्यात आला. धानीवबागच्या गांगडीपाडा येथील साईशारदा वेल्फेअर सोसायटीत सोमवारी दि. २१ रोजी सकाळी विजय चौहान (वय ३४) यांची हत्या करण्यात आली.


तसेच त्या मृतदेहावर नवीन टाईल्स लावल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांची पत्नी चमन देवी (वय २८) आणि प्रियकर मोनू शर्मा (वय २०) याच्या मदतीने ही निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरण्यात आला. हा प्रकार १५ दिवसांनी उघड झाला. आरोपी पत्नी ही प्रियकरासोबत फरार झाली असून पेल्हार पोलीस त्यांचा तपास करत आहे.


अखिलेश चौहान (२४) याने रविवारी रात्री भाऊ विजयचा शोध घेऊनही काही पत्ता लागत नसल्याने पेल्हार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. शेजारी राहणाऱ्या प्रियकर मोनू सोबत आरोपी चमन देवी पळून गेल्याची माहिती विजयचा भाऊ अखिलेश याने दिली. तसेच त्या परिसरातील मोबाईलवाला सर्वेश गिरी याचाही यात सहभाग असल्याचा आरोपही त्याने केला.


जमिनीतून वास येत असल्याने मृतदेह जमिनीत असल्याचे समजले. पण मनपा डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट आल्याशिवाय जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांची टीम घटनास्थळी असून तपास व आरोपींचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार