कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा उबाठा गटाकडून प्रयत्न, तीन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिकमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जात असताना, उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन त्यांच्या ताफ्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर विरोधकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आज सकाळी नाशिक रोड येथील अनुराधा चौकात आयोजित कार्यक्रमात कोकाटे जात असताना त्यांच्या ताफ्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निषेधात्मक कृतीत उबाठाचे उपजिल्हाप्रमुख भैया मणियार, योगेश देशमुख आणि निलेश शिरसाठ यांनी सहभाग घेतला होता. या तिघांनी कृषी मंत्री कोकाटे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी त्यांनी कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करून वातावरण तापवले. दरम्यान पोलिसांनी तत्काळ तिथे येऊन या तिघांना ताब्यात घेतले.


सदर प्रकरण आणखीन चिघळू नये तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या