न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग

लोकसभा अध्यक्षांना, राज्यसभा सभापतींना निवेदन सादर


नवी दिल्ली : घरात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी चर्चेत आलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली आहे.


सोमवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, लोकसभेच्या १४५ खासदारांनी वर्मा यांच्याविरुद्ध आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली. राज्यसभेतील ५४ खासदारांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दिला. खासदारांनी स्वाक्षरी केलेले निवेदन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना सादर केल्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.


या महाभियोग प्रस्तावाला भाजप, काँग्रेस, टीडीपी, जेडीयू, सीपीएम यांसह विविध पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले