कल्याणमध्ये 'लेहेंगा' राडा: नववधूच्या होणाऱ्या नवऱ्याने कापला ३२ हजारांचा लेहेंगा!

कल्याण: 'राग माणसाचा शत्रू असतो' हे पुन्हा एकदा कल्याणमधील एका घटनेतून सिद्ध झाले आहे. लग्न समारंभासाठी घेतलेल्या ३२ हजार रुपयांच्या लेहेंग्यावरून एका तरुणाने चक्क दुकानात गोंधळ घालत तो लेहेंगा चाकूने कापून टाकला आणि दुकानदाराकडे पैशाची मागणी केली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.


मेघना मखिजा या तरुणीने आपल्या लग्नासाठी एका दुकानातून ३२ हजार रुपयांचा लेहेंगा खरेदी केला होता. मात्र, नंतर तिला तो लेहेंगा पसंत न पडल्याने ती तो परत करण्यासाठी दुकानात गेली. दुकानदाराने लेहेंगा परत घेण्यास नकार देत, "एक महिन्यात लेहेंगा बदलून मिळेल" असे सांगितले. परंतु, मेघनाला लेहेंगा बदलून घेण्याऐवजी खरेदी केलेले पैसे परत हवे होते.


हा वाद सुरू असतानाच, मेघनाचा होणारा पती सुमित सयानी दुकानात दाखल झाला. त्याने कोणताही विचार न करता, थेट हातात चाकू घेऊन तो लेहेंगा तिथेच कापून टाकला! या अनपेक्षित प्रकारामुळे गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या दुकानदाराने तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये या घटनेबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही जण दुकानदाराला चुकीचे ठरवत आहेत, तर बहुसंख्य लोकांनी मात्र लेहेंगा कापणाऱ्या तरुणाला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, दोषींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या