आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला सहा पदके

  65

मुंबई : ऑस्ट्रेलियातील ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली. विशेष बाब म्हणजे भारताने सर्व देशांमधून सातवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ११० देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ६३० विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये ६९ मुलींचा समावेश होता.

यंदा ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे १० ते २० जुलै या कालावधीत ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचे (आयएमओ २०२५) आयोजन करण्यात आले होते. सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय संघामध्ये दिल्लीतील कणव तलवार,आरव गुप्ता आणि महाराष्ट्रातील आदित्य मांगुडी वेंकट गणेश यांनी ‘सुवर्ण पदक’ पटकावले. कर्नाटकमधील एबेल जॉर्ज मॅथ्यू व दिल्लीतील आदिश जैन यांनी ‘रौप्य पदक’ आणि दिल्लीतील अर्चित मानस याने ‘कांस्य पदक’ पटकावले. या भारतीय संघाचे नेतृत्व दिल्लीतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या प्रा. शांता लैशराम आणि सहनेतृत्व बंगळुरूतील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. मैनक घोष यांनी केले. तर अतुल शतावर्त नादिग आणि डॉ. रिजुल सैनी यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

दरम्यान, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, ही गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, यासह विविध विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे नोडल केंद्र आहे.

Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही