दीपिका पादुकोण-फराह खान यांच्यात पडली मोठी फूट! इन्स्टाग्रामवर एकमेकींना केलं अनफॉलो; फराह खानने स्पष्टचं सांगितलं...

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी मैत्रीच्या जोड्यांपैकी एक असलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika Padukone) आणि कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) यांच्यात मोठा वाद झाल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. याचे कारण म्हणजे, या दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो (Unfollow) केले आहे. फराह खानच्याच 'ओम शांती ओम' या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण (Debut) केले होते. तेव्हापासून या दोघींमध्ये चांगली आणि घनिष्ठ मैत्री होती. मात्र, आता सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांपासून फारकत घेतल्यामुळे नेटकरी संभ्रमात पडले आहेत, की त्यांच्यात नेमके काय बिनसले आहे. या दोघींनी एकमेकांना अनफॉलो करण्याची वेळ खूप सूचक (Indicative) आहे. दीपिका आणि फराह यांनी एकमेकांना अशा वेळी अनफॉलो केले, जेव्हा इंडस्ट्रीत ८ तासांच्या कामाच्या शिफ्टचा मुद्दा चर्चेत होता आणि दीपिकाने या मागणीचे समर्थन केले होते. यावरूनच त्यांच्यात मतभेद झाले असावेत, अशी जोरदार चर्चा आहे. फराह खानने तर फक्त दीपिकालाच नाही, तर तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहलाही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. मात्र, या वादामध्ये रणवीर सिंहने अजूनही फराह खानला इन्स्टाग्रामवर फॉलो करणे सुरू ठेवले आहे. यामुळे 'ओम शांती ओम' चित्रपटातून सुरू झालेली ही मैत्री आता संपुष्टात आली असून, बॉलिवूडच्या या दोन मोठ्या नावांमध्ये नेमका काय वाद झाला, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इंडस्ट्री आणि चाहते उत्सुक आहेत.



दीपिका पादुकोण आणि फराह खानमध्ये '८ तासांच्या शिफ्ट'वरून मतभेद


अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक फराह खान यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामागे कामाच्या शिफ्टचा मुद्दा आणि फराह खानची टोमणा मारणारी टिप्पणी हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. या वादाची सुरुवात फराह खानच्या युट्यूब व्लॉगमधून झाली. फराहने अभिनेत्री राधिका मदनला तिच्या पहिल्या ऑडिशनबद्दल विचारले होते. राधिका मदनने तिची पहिली शिफ्ट "५६ तास नॉन-स्टॉप" आणि दुसरी शिफ्ट "४८ तास न थांबता" होती, असे सांगितले. यावर फराह खानने दीपिकाच्या मागणीकडे लक्ष वेधत राधिकाला विचारले होते, "मला असं वाटतं की तुझी शिफ्ट ८ तासांची नव्हती?" त्यानंतर फराहने ८ तासांच्या शिफ्टला पाठिंबा नसताना, "आगीत तळपूनच सोनं चमकतं" असे म्हणत राधिकाच्या मेहनतीचे कौतुक केले. या घटनेनंतर, फराह खानने एका दुसऱ्या व्लॉगमध्ये पुन्हा दीपिकावर थेट टोमणा मारला. जेव्हा फराहला विचारण्यात आले की दीपिका पादुकोण तिच्या व्लॉगमध्ये कधी दिसणार? त्यावर फराहने विनोदी अंदाजात म्हटले, "ती फक्त ८ तासांचं शूटिंग करते. तिच्याकडे व्लॉगसाठी वेळ नाही." फराहच्या या वक्तव्यावरून तिने दीपिकाच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीला स्पष्ट विरोध दर्शवला आणि या दोन मैत्रिणींमध्ये मोठे वैचारिक मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे त्यांनी अखेरीस एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.



दीपिकाच्या २५% फी वाढीमुळे निर्माते हतबल


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या कामाच्या तासांबद्दल आणि मानधनाबद्दलच्या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. याच कारणामुळे तिच्या हातातून दोन मोठे आणि महत्त्वपूर्ण चित्रपटांचे प्रोजेक्ट्स निसटले असल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाने गमावलेल्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एक म्हणजे सुपरहिट चित्रपट ‘कल्की’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटातून तिला काढण्यात आले आहे. तर त्याआधी तिने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट' या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून स्वतःहून माघार घेतली होती. या दोन्ही चित्रपटातून दीपिकाला बाहेर पडावे लागण्यामागे तिच्या कामाचे तास कमी करण्याची मागणी आणि मानधनात मोठी वाढ करण्याची भूमिका कारणीभूत ठरली, अशी जोरदार चर्चा आहे. 'स्पिरीट' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी दीपिकाने सुमारे २० दिवस शूटिंगसुद्धा केले होते. मात्र, दीपिकाने केलेली २५ टक्के फी वाढवण्याची मागणी निर्मात्यांना मान्य करता आली नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले. या घटनांमुळे दीपिकाच्या व्यावसायिक निर्णयांवर आणि तिच्या मानधनाच्या मागणीवर बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.