जिंकण्याची खात्री असलेल्या जागाच लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वक्तव्य


मुंबई : ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्याच जागा लढवण्याचा निर्णय महायुती घेणार असून, केवळ संख्येसाठी जागा अडवण्याऐवजी इलेक्टिव्ह मेरिटवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमानंतर रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागावाटपाबाबत महायुतीच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. यात ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्या जागा लढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचे इलेक्टिव्ह मेरिट तपासले जाणार, असेही त्यांनी नमूद केले.


शिवसेनेने मुंबईतील शाखाप्रमुखांशी संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शिंदे यांनी यावेळी शाखाप्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा आहे. ते स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. आता सर्व शाखाप्रमुख निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी ते उत्सुक आहेत,’ असे शिंदे म्हणाले.


शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षांत आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. ‘मुंबई पालिकेसाठी विविध विकास प्रकल्प राबवले गेले आहेत. या कामांच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. जनता आमच्या कामांवर विश्वास ठेवते आणि याच विश्वासाच्या जोरावर आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



मुंबईत महायुतीचाच महापौर


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचाच महापौर असेल, असा दावा शिंदे यांनी केला. ‘कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे,’ असे त्यांनी सांगितलं. यासाठी कार्यकर्ते आणि पक्ष यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर