जिंकण्याची खात्री असलेल्या जागाच लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वक्तव्य


मुंबई : ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्याच जागा लढवण्याचा निर्णय महायुती घेणार असून, केवळ संख्येसाठी जागा अडवण्याऐवजी इलेक्टिव्ह मेरिटवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमानंतर रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागावाटपाबाबत महायुतीच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. यात ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्या जागा लढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचे इलेक्टिव्ह मेरिट तपासले जाणार, असेही त्यांनी नमूद केले.


शिवसेनेने मुंबईतील शाखाप्रमुखांशी संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शिंदे यांनी यावेळी शाखाप्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा आहे. ते स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. आता सर्व शाखाप्रमुख निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी ते उत्सुक आहेत,’ असे शिंदे म्हणाले.


शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षांत आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. ‘मुंबई पालिकेसाठी विविध विकास प्रकल्प राबवले गेले आहेत. या कामांच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. जनता आमच्या कामांवर विश्वास ठेवते आणि याच विश्वासाच्या जोरावर आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



मुंबईत महायुतीचाच महापौर


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचाच महापौर असेल, असा दावा शिंदे यांनी केला. ‘कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे,’ असे त्यांनी सांगितलं. यासाठी कार्यकर्ते आणि पक्ष यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व