Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात नियोजनाचा अभाव; MMRDA वर उभारलेले खांब तोडण्याची वेळ

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन ६ प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (MMRDA) नियोजनशून्यता चव्हाट्यावर आली आहे. कारशेडच्या स्थानात अचानक बदल झाल्यामुळे कांजुरमार्ग परिसरात आधीच बांधलेले काही मेट्रोचे खांब आता पाडावे लागत असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे समोर आले आहे.


मेट्रो ६ प्रकल्पात झालेल्या अलाइनमेंट बदलांमुळे उभारलेले काही खांब आता अडथळा ठरत असून, त्यांचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. कारशेडसाठी सुरुवातीला ज्या ठिकाणी जागा निश्चित केली होती, ती बदलून राज्य सरकारने २०२३ मध्ये कांजुरमार्गच्या उत्तरेला नवीन जागा दिली. परिणामी मेट्रो मार्गात तांत्रिक बदल करावे लागले, त्यामुळे आधी उभारलेले खांब पाडावे लागले.


या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे सिव्हिल काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. मात्र कारशेडचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. राज्य सरकार व MMRDA यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे वेळ आणि निधी या दोन्ही बाबतीत प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे.


सुमारे १५.३१ किमी लांबीच्या आणि १३ स्थानकांच्या मेट्रो लाईन ६ प्रकल्पाच्या माध्यमातून अंधेरीच्या स्वामी समर्थ नगरपासून विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत जोडणी होणार आहे. हा मार्ग जेव्हीएलआर आणि पवई तलावावरून जाणार असून, या मार्गाची संपूर्ण उभारणी MMRDA करत आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ६,७०० कोटी रुपये आहे.


२०२५ मध्ये मुंबई उच्चन्यायालयाने कांजुरमार्गच्या नवीन जागेवर कारशेड उभारणीस परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पूर्णता पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.


सार्वजनिक निधीचा असा अपव्यय होत असल्याने आता MMRDA वर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.


एकूणच मुंबईत आधुनिक सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे उभारले जात असले, तरी नियोजनातील त्रुटी आणि गैरव्यवस्थापनामुळे हे प्रकल्प वेळेत आणि खर्चात पूर्ण होण्याच्या दिशेने न सरकता मागे जात आहेत. मेट्रो लाईन ६ हे त्याचेच ताजे उदाहरण आहे.

Comments
Add Comment

Fuel theft racket busted in Wadala : वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि

Cabinet sub-committee's decision : सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे.

Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

- राज्य शासनाकडून १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी (१६ जून) बारा सनदी

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार