"माझ्या विधानावर पक्ष नाराज आहे, पण मी बरोबर आहे": शशी थरूर

पक्षनिष्ठेबाबत स्पष्टच बोलले शशी थरूर


नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) वर मोदी सरकार आणि सैन्याला पाठिंबा देत म्हटले आहे की देशाची सुरक्षा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते त्यांच्या पक्षाचा आदर करतात, परंतु त्याहून जास्त महत्वाचा भारत येतो.


थरूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कोची येथील एका शालेय विद्यार्थ्याने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेबद्दल प्रश्न विचारला. थरूर म्हणाले, 'मी या विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळत असलो तरी, मला या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक वाटले.'



जेव्हा देशाचा विचार येतो...


थरूर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ऊदाहरण देत म्हटले आहे की, 'जर देशच मेला तर कोण वाचेल?' ते म्हणाले की जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा आपण राजकीय मतभेद विसरून एकत्र उभे राहिले पाहिजे. शशी थरूर यांनी असेही म्हटले की, मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मात्र ते या भूमिकेवर ठाम राहतील कारण ते राष्ट्रीय हिताचे आहे.



राजकीय पक्षाआधी, भारत प्रथम येतो


केरळचे खासदार थरूर म्हणाले, 'राजकीय पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे माध्यम आहेत. पण जर एखादा निर्णय राष्ट्रीय हिताचा असेल तर त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे. माझ्या मते, भारत प्रथम येतो.' थरूर यांनी कबूल केले की काही पक्षाचे नेते त्यांच्या विधानांवर नाराज आहेत. ते म्हणाले, 'मी सरकार आणि लष्कराला पाठिंबा दिल्यामुळे बरेच लोक माझी टीका करत आहेत, परंतु मी जे बोललो ते भारतासाठी योग्य आहे असे मला वाटते.'


ते म्हणाले की जेव्हा ते 'भारत' म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त काँग्रेस किंवा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व भारतीयांचा असतो. थरूर यांच्या मते, संसदेत शेकडो पक्ष असू शकतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या