पश्चिम रेल्वेतर्फे पाच गणपती विशेष गाड्या धावणार

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.


०९०११ मुंबई सेंट्रल - ठोकूर स्पेशल मंगळवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल.


त्याचप्रमाणे ०९०१२ ठोकूर - मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी बुधवारी ठोकूर येथून सकाळी ११ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दि. २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड विशेष आठवड्यातून रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०२० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून पहाटे ४:५० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ :१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस - रत्नागिरी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी २:२० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०१६ रत्नागिरी - वांद्रे टर्मिनस स्पेशल शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२ :३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११४ वडोदरा - रत्नागिरी स्पेशल मंगळवारी वडोदरा येथून सकाळी ११:१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९११३ रत्नागिरी-वडोदरा स्पेशल बुधवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ :३० वाजता वडोदरा येथे पोहोचेल. ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११० विश्वामित्री - रत्नागिरी स्पेशल ही बुधवार आणि शनिवारी सकाळी १०:०० वाजता विश्वामित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९१०९ रत्नागिरी - विश्वामित्री स्पेशल ही गाडी रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५: ३० वा. विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९०११, ०९०१९, ०९०१५, ०९११४ आणि ०९११० या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग दि. २३ जुलैपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल