पश्चिम रेल्वेतर्फे पाच गणपती विशेष गाड्या धावणार

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.


०९०११ मुंबई सेंट्रल - ठोकूर स्पेशल मंगळवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल.


त्याचप्रमाणे ०९०१२ ठोकूर - मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी बुधवारी ठोकूर येथून सकाळी ११ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दि. २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड विशेष आठवड्यातून रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०२० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून पहाटे ४:५० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ :१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस - रत्नागिरी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी २:२० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०१६ रत्नागिरी - वांद्रे टर्मिनस स्पेशल शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२ :३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११४ वडोदरा - रत्नागिरी स्पेशल मंगळवारी वडोदरा येथून सकाळी ११:१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९११३ रत्नागिरी-वडोदरा स्पेशल बुधवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ :३० वाजता वडोदरा येथे पोहोचेल. ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल.


ट्रेन क्रमांक ०९११० विश्वामित्री - रत्नागिरी स्पेशल ही बुधवार आणि शनिवारी सकाळी १०:०० वाजता विश्वामित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री १२ :३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९१०९ रत्नागिरी - विश्वामित्री स्पेशल ही गाडी रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून पहाटे १:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५: ३० वा. विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावेल. ०९०११, ०९०१९, ०९०१५, ०९११४ आणि ०९११० या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग दि. २३ जुलैपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक