चंद्रभागेत तीन महिलांचा बुडून मृत्यू

पंढरपूर : शनिवारी सकाळी चंद्रभागेच्या नदी पात्रात जालना जिल्ह्यातील तीन महिला बुडाल्या . २ महिलांचा मृतदेह सापडला असून तिसऱ्या महिलेचा अजून तपास सुरु आहे .


पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात . दर्शनासाठी जाण्यापूर्वी भाविक पहिले चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात . आज सकाळी विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या काही महिला भाविक स्नानासाठी नदीकाठी पोहोचल्या . यातील ३ महिला चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. त्या पुंडलिक मंदिराजवळ स्नानासाठी गेल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या. संगीताबाई संजू सपकाळ, वय ४२ आणि सुनीताबाई महादू सपकाळ, वय ३८ अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या महिलेचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.


नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भावीक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड करून मदतीसाठी पुकारणा केली. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही ही महिला बुडल्या. चंद्रभागेवरील कोळी बांधवांनी बुडालेल्या दोन महिलांचा मृतदेह बाहेर काढला असून तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे .


नदीकाठी आपत्कालीन व्यवस्था तैनात नसल्याने त्वरित मदत मिळाली नाही आणि या तीन भाविक महिलांना आपला जीव गमवावा लागला असं घटनास्थळी दाखल असलेलं इतर भाविक सांगत आहेत . दरम्यान या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .


या घटनेनंतर चंद्रभागेच्या काठावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाची एक रेस्क्यू टीम तैनात करण्यात यावी अशी मागणी भाविक आणि इतर स्थानिकांकडून करण्यात येत आहे .

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद