चंद्रभागेत तीन महिलांचा बुडून मृत्यू

पंढरपूर : शनिवारी सकाळी चंद्रभागेच्या नदी पात्रात जालना जिल्ह्यातील तीन महिला बुडाल्या . २ महिलांचा मृतदेह सापडला असून तिसऱ्या महिलेचा अजून तपास सुरु आहे .


पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात . दर्शनासाठी जाण्यापूर्वी भाविक पहिले चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात . आज सकाळी विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या काही महिला भाविक स्नानासाठी नदीकाठी पोहोचल्या . यातील ३ महिला चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. त्या पुंडलिक मंदिराजवळ स्नानासाठी गेल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या. संगीताबाई संजू सपकाळ, वय ४२ आणि सुनीताबाई महादू सपकाळ, वय ३८ अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या महिलेचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.


नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भावीक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड करून मदतीसाठी पुकारणा केली. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही ही महिला बुडल्या. चंद्रभागेवरील कोळी बांधवांनी बुडालेल्या दोन महिलांचा मृतदेह बाहेर काढला असून तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे .


नदीकाठी आपत्कालीन व्यवस्था तैनात नसल्याने त्वरित मदत मिळाली नाही आणि या तीन भाविक महिलांना आपला जीव गमवावा लागला असं घटनास्थळी दाखल असलेलं इतर भाविक सांगत आहेत . दरम्यान या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .


या घटनेनंतर चंद्रभागेच्या काठावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाची एक रेस्क्यू टीम तैनात करण्यात यावी अशी मागणी भाविक आणि इतर स्थानिकांकडून करण्यात येत आहे .

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा