डाक विभागाची डिजिटल क्रांती : महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘IT २.० APT अप्लिकेशन’चा शुभारंभ

पोस्ट ऑफिस आता आणखी स्मार्ट होणार!



डाक विभागाकडून डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ‘APT (Advanced Platform for Transformation) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर २२ जुलै २०२५ रोजी काही निवडक प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खालील मुख्य पोस्ट ऑफिस आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सब पोस्ट ऑफिस आणि शाखा पोस्ट ऑफिसमध्ये नव्या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल.


या पोस्टऑफिसमध्ये होणार नव्या प्रणालीची अंमलबजावणी




  • महिम मुख्य पोस्ट ऑफिस

  • ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस


  • श्रीरामपूर मुख्य पोस्ट ऑफिस


  • जळगाव मुख्य पोस्ट ऑफिस


  • अमरावती मुख्य पोस्ट ऑफिस


  • कोल्हापूर मुख्य पोस्ट ऑफिस




सर्व व्यवहार तात्पुरते बंद



नवीन प्रणालीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात डेटा माइग्रेशन, सिस्टीम तपासणी आणि आवश्यक कॉन्फिगरेशनची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.



 APT अप्लिकेशनची वैशिष्ट्ये काय?




  • अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा

  • ग्राहकांसाठी वापरायला सुलभ आणि आधुनिक इंटरफेस

  • जलद सेवा वितरणाची हमी

  • कार्यक्षम, स्मार्ट आणि भविष्योन्मुख पोस्ट सेवा प्रणाली




 ग्राहकांना विनंती 



सर्व ग्राहकांनी आपल्या पोस्ट ऑफिस भेटीचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. दिलगिरी व्यक्त करत आहोत की या प्रक्रियेमुळे थोडा त्रास होऊ शकतो, मात्र या डिजिटल परिवर्तनामुळे भविष्यात आणखी जलद, सुरक्षित आणि सोयीच्या सेवा मिळणार आहेत.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन