डाक विभागाची डिजिटल क्रांती : महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘IT २.० APT अप्लिकेशन’चा शुभारंभ

  107

पोस्ट ऑफिस आता आणखी स्मार्ट होणार!



डाक विभागाकडून डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ‘APT (Advanced Platform for Transformation) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर २२ जुलै २०२५ रोजी काही निवडक प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खालील मुख्य पोस्ट ऑफिस आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सब पोस्ट ऑफिस आणि शाखा पोस्ट ऑफिसमध्ये नव्या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल.


या पोस्टऑफिसमध्ये होणार नव्या प्रणालीची अंमलबजावणी




  • महिम मुख्य पोस्ट ऑफिस

  • ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस


  • श्रीरामपूर मुख्य पोस्ट ऑफिस


  • जळगाव मुख्य पोस्ट ऑफिस


  • अमरावती मुख्य पोस्ट ऑफिस


  • कोल्हापूर मुख्य पोस्ट ऑफिस




सर्व व्यवहार तात्पुरते बंद



नवीन प्रणालीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात डेटा माइग्रेशन, सिस्टीम तपासणी आणि आवश्यक कॉन्फिगरेशनची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.



 APT अप्लिकेशनची वैशिष्ट्ये काय?




  • अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा

  • ग्राहकांसाठी वापरायला सुलभ आणि आधुनिक इंटरफेस

  • जलद सेवा वितरणाची हमी

  • कार्यक्षम, स्मार्ट आणि भविष्योन्मुख पोस्ट सेवा प्रणाली




 ग्राहकांना विनंती 



सर्व ग्राहकांनी आपल्या पोस्ट ऑफिस भेटीचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. दिलगिरी व्यक्त करत आहोत की या प्रक्रियेमुळे थोडा त्रास होऊ शकतो, मात्र या डिजिटल परिवर्तनामुळे भविष्यात आणखी जलद, सुरक्षित आणि सोयीच्या सेवा मिळणार आहेत.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून